शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वरभक्तीनेच माणसाचे जीवन सुधारते - विजयकुमार पल्लोड

By admin | Updated: February 17, 2016 01:07 IST

सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच

गडचिरोली : सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. ईश्वर भक्तीने व नामस्मरणाने माणसाचे जीवन निश्चित सुधारते, असा उपदेश औरंगाबाद येथील प.पु. पंडित विजयकुमार पल्लोड यांनी केला. शर्मा परिवार गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी येथील श्रीद्वारका नगरीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपदेश करताना ते बोलत होते. भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या पूर्वी सकाळच्या सुमारास शहरातून कलश शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर पूजाअर्चा करून भागवत कथा ज्ञानयज्ञाला दुपारी २ वाजता सुरूवात झाली. साधना व तपस्यामय जीवनानेच माणसाला सूख मिळते. भागवत कथा ऐकल्याने माणसाच्या शरीराला ऊर्जा मिळते. गुरू-शिष्याच्या संबंधाशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. सद्य:स्थितीत सोना, चांदी, पेट्रोल, डिझेल, तांदूळ, गहू भौतिक वस्तुंची भाववाढ झाली आहे. त्यानुसार भक्तीज्ञानाचेही भाव वाढले आहेत. प्रत्येक व्यक्तीला मानसन्मान देऊन कार्य करा, सत्कर्म करताना येणाऱ्या अडचणीला खचून न जाता अडचणींचा खंबीरपणे सामना करून सत्कर्म अविरत सुरू ठेवा, असा सल्लाही पंडित पल्लोड महाराज यांनी यावेळी दिला. काल, कर्म, स्वभाव हे माणसाच्या दु:खाचे खरे कारण आहेत. काळानुसार सत्कर्म करून पुण्य मिळवा. माणसाचा स्वभाव बदलत नाही. चांगल्या स्वभावाने वागून मंत्रपठणातून आत्मिक शांती निर्माण करा. खोटे बोलून प्रचंड धन कमाविता येते. मात्र माणसाच्या जीवनात सुख, शांती व आत्मिक समाधान फारसे मिळत नाही. खाण्यावर नियंत्रण ठेवून सत्य बोलून तसेच सत्य वागून मानवी जीवन सार्थक करा, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)