शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

ईश्वरभक्तीनेच माणसाचे जीवन सुधारते - विजयकुमार पल्लोड

By admin | Updated: February 17, 2016 01:07 IST

सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच

गडचिरोली : सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. ईश्वर भक्तीने व नामस्मरणाने माणसाचे जीवन निश्चित सुधारते, असा उपदेश औरंगाबाद येथील प.पु. पंडित विजयकुमार पल्लोड यांनी केला. शर्मा परिवार गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी येथील श्रीद्वारका नगरीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपदेश करताना ते बोलत होते. भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या पूर्वी सकाळच्या सुमारास शहरातून कलश शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर पूजाअर्चा करून भागवत कथा ज्ञानयज्ञाला दुपारी २ वाजता सुरूवात झाली. साधना व तपस्यामय जीवनानेच माणसाला सूख मिळते. भागवत कथा ऐकल्याने माणसाच्या शरीराला ऊर्जा मिळते. गुरू-शिष्याच्या संबंधाशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. सद्य:स्थितीत सोना, चांदी, पेट्रोल, डिझेल, तांदूळ, गहू भौतिक वस्तुंची भाववाढ झाली आहे. त्यानुसार भक्तीज्ञानाचेही भाव वाढले आहेत. प्रत्येक व्यक्तीला मानसन्मान देऊन कार्य करा, सत्कर्म करताना येणाऱ्या अडचणीला खचून न जाता अडचणींचा खंबीरपणे सामना करून सत्कर्म अविरत सुरू ठेवा, असा सल्लाही पंडित पल्लोड महाराज यांनी यावेळी दिला. काल, कर्म, स्वभाव हे माणसाच्या दु:खाचे खरे कारण आहेत. काळानुसार सत्कर्म करून पुण्य मिळवा. माणसाचा स्वभाव बदलत नाही. चांगल्या स्वभावाने वागून मंत्रपठणातून आत्मिक शांती निर्माण करा. खोटे बोलून प्रचंड धन कमाविता येते. मात्र माणसाच्या जीवनात सुख, शांती व आत्मिक समाधान फारसे मिळत नाही. खाण्यावर नियंत्रण ठेवून सत्य बोलून तसेच सत्य वागून मानवी जीवन सार्थक करा, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)