शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

ईश्वरभक्तीनेच माणसाचे जीवन सुधारते - विजयकुमार पल्लोड

By admin | Updated: February 17, 2016 01:07 IST

सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच

गडचिरोली : सध्याच्या धावपळ व व्यस्ततेच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. ईश्वर भक्तीने व नामस्मरणाने माणसाचे जीवन निश्चित सुधारते, असा उपदेश औरंगाबाद येथील प.पु. पंडित विजयकुमार पल्लोड यांनी केला. शर्मा परिवार गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी येथील श्रीद्वारका नगरीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपदेश करताना ते बोलत होते. भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या पूर्वी सकाळच्या सुमारास शहरातून कलश शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर पूजाअर्चा करून भागवत कथा ज्ञानयज्ञाला दुपारी २ वाजता सुरूवात झाली. साधना व तपस्यामय जीवनानेच माणसाला सूख मिळते. भागवत कथा ऐकल्याने माणसाच्या शरीराला ऊर्जा मिळते. गुरू-शिष्याच्या संबंधाशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. सद्य:स्थितीत सोना, चांदी, पेट्रोल, डिझेल, तांदूळ, गहू भौतिक वस्तुंची भाववाढ झाली आहे. त्यानुसार भक्तीज्ञानाचेही भाव वाढले आहेत. प्रत्येक व्यक्तीला मानसन्मान देऊन कार्य करा, सत्कर्म करताना येणाऱ्या अडचणीला खचून न जाता अडचणींचा खंबीरपणे सामना करून सत्कर्म अविरत सुरू ठेवा, असा सल्लाही पंडित पल्लोड महाराज यांनी यावेळी दिला. काल, कर्म, स्वभाव हे माणसाच्या दु:खाचे खरे कारण आहेत. काळानुसार सत्कर्म करून पुण्य मिळवा. माणसाचा स्वभाव बदलत नाही. चांगल्या स्वभावाने वागून मंत्रपठणातून आत्मिक शांती निर्माण करा. खोटे बोलून प्रचंड धन कमाविता येते. मात्र माणसाच्या जीवनात सुख, शांती व आत्मिक समाधान फारसे मिळत नाही. खाण्यावर नियंत्रण ठेवून सत्य बोलून तसेच सत्य वागून मानवी जीवन सार्थक करा, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)