शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्ल्याने दगावली शेळी; मैदानावर पत्रावळ्या अस्ताव्यस्त  

By संजय तिपाले | Updated: January 11, 2024 19:09 IST

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानामध्ये हजारो महिलांना एकत्रित आणले होते.

गडचिरोली: शहरातील एमआयडीसीजवळील कोटगल रस्त्यालगतच्या मैदानावर ९ जानेवारीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांना वाटप केलेले शिल्लक अन्न तसेच पत्रावळ्या उघड्यावर फेकण्यात आल्या. तेथे शिळा भात खाल्ल्याने एका शेतकऱ्याची शेळी दगावली असून, दुसरी शेळीही आजारी पडली आहे. कोटगल येथे ११ जानेवारी रोजी ही घटना समोर आली.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानामध्ये हजारो महिलांना एकत्रित आणले होते. यावेळी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार ५०० महिलांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली दिला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह खासदार, आमदार व स्थानिक नेते तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांना जेवण देण्यात आले. शिल्लक अन्न व पत्रावळ्या उघड्यावरच टाकल्या होत्या. 

या पत्रावळ्या कार्यक्रमस्थळी अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. दरम्यान, १० जानेवारीला नित्याप्रमाणे कोटगल येथील श्रीकृष्ण कवडुजी भोयर यांच्या शेळ्या गुराख्याने चारण्यासाठी परिसरात नेल्या होत्या. सायंकाळी शेळ्यांचा कळप घराकडे परत असताना भोयर यांच्या दोन शेळ्यांनी पत्रावळीवरील भात खाल्ला, काही वेळाने दोन्ही शेळ्या फुगल्या. भोयर यांनी तात्काळ खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले; पण उपचारानंतर एक शेळी दगावली असून, दुसरी शेळीही अत्यवस्थ आहे. दोन्ही शेळ्यांची किंमत प्रत्येकी दहा हजार रुपये असून, कार्यक्रमस्थळावरील शिळा भात खाण्यात आल्यामुळेच शेळ्यांवर हे संकट ओढावल्याचा दावा भोयर यांनी लोकमतशी बोलताना केला. याबाबत तहसीलदार महेंद्र गणवीर यांना संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची जबाबदारी घेऊन संबंधितास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

तहसील प्रशासनाचा हलगर्जीपणाने गालबोटकोटगल परिसरातील कार्यक्रम गडचिरोली तहसील हद्दीत झाला होता. मात्र, तहसील प्रशासनाने शिळ्या अन्नासह पत्रावळ्यांची योग्य विल्हेवाट लावली नाही, त्यामुळे मुक्या प्राण्याचा बळी गेला. या परिसरात चारण्यासाठी गुरे नेली जातात, त्यामुळे खबरदारी आवश्यक होती; पण शेळीच्या मृत्यूने तहसील प्रशासनाची हलगर्जी चव्हाट्यावर आली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली