शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दुर्दैवी! भावाच्या हातावर राखी बांधण्याआधीच तिच्यावर काळाने घातली झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 13:52 IST

राखी घेण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले

आरमोरी (गडचिरोली) : एक आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनासाठी आपल्या मावशीच्या मुलासाठी (मावसभावासाठी) राखी घेण्यासाठी मैत्रिणींसोबत सायकलने दुकानात जाणाऱ्या विद्यार्थिनीला काळ बनून आलेल्या ट्रकने चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ऐन या भावनिक सणाच्या तोंडावर मावसभावाच्या हातावर राखी बांधण्याआधीच त्या बहिणीला काळाने हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रांजली नितेश भानारकर (१७ वर्षे) रा. मोहझरी असे त्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास आरमोरीत घडला. आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील रहिवासी असलेली प्रांजली आरमोरी येथील वसतिगृहात राहून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिला सख्खा भाऊ नसल्याने ती दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला आपल्या मावसभावाला राखी बांधत होती.

या वर्षी रक्षाबंधनाचा सण अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेवल्याने प्रांजली एका मैत्रिणीला घेऊन राख्या पाहण्यासाठी सायकलने निघाली होती. देसाईगंज मार्गावरील एका दुकानात त्या दोघी जात असताना देसाईगंजवरून आरमोरीकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच २० सीटी ४०४१) प्रांजलीला जबर धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला तत्काळ आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार बसल्याने तिचा मृत्यू झाला.

ट्रक रस्त्यालगत ठेवून चालक पसार

या अपघातानंतर नागरिक आपल्याला सोडणार नाही, हे लक्षात येताच ट्रकचालकाने आरमोरी-ब्रह्मपुरी रस्त्यालगत ट्रक उभा ठेवला आणि तो तेथून पसार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालकाचा शोध सुरू आहे. सदर घटनेने आरमोरीसह मोहझरी परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, नातेवाईक आणि आरमोरीतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Accidentअपघातarmori-acअरमोरीgadchiroli-acगडचिरोली