शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘गाेंडवाना’चे विद्यार्थी राहणार पीजी अभ्यासक्रमांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 08:30 IST

Gadchiroli News गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा व निकालास उशीरनागपूर विद्यापीठात ४ पर्यंतच मुदत

दिगांबर जवादे

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. राज्यातील इतरही काही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुदत पुढच्या महिन्यात संपणार आहे; मात्र गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल लागेपर्यंत इतर विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशद्वार बंद होणार आहे. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Gandwana students will be deprived of PG courses)

काेराेनाच्या संकटामुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात यावर्षी गोंडवाना विद्यापीठ अजूनच माघारले. २०२०-२१ या शैक्षणिक सत्राच्या अंतिम परीक्षा गाेंडवाना विद्यापीठाने १० ऑगस्टपासून घेण्यास सुरुवात केली. ३१ ऑगस्ट राेजी शेवटचा पेपर आहे. निकाल घाेषित हाेण्यास पुन्हा एक महिन्याचा कालावधी लागेल; मात्र रा.तु.म. नागपूर विद्यापीठाने यापूर्वीच परीक्षा आटाेपल्या असून, निकालही घाेषित केले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

 

प्रवेश अर्ज भरण्यापासून राहणार वंचित

- गाेंडवाना विद्यापीठातील अनेक विद्यार्थी नागपूर विद्यापीठात प्रवेश घेण्यास इच्छुक राहतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना पदवीच्या अंतिम परीक्षेचे गुण भरावे लागतात; मात्र गाेंडवाना विद्यापीठाचे निकालच लागले नसल्याने प्रवेश अर्जात गुण भरता येणार नाही. त्यामुळे अर्जही स्वीकारला जाणार नाही.

- नागपूर विद्यापीठाबराेबरच इतरही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्याही विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येणार नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दुसरे विद्यापीठ प्रवेशासाठी मुदतवाढ देतील व गाेंडवाना विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालक करीत आहेत.

गाेंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर ३१ ऑगस्टला आहे. ५ सप्टेंबरला निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नागपूर विद्यापीठाने ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली असली तरी त्याला एक ते दीड महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. दरवर्षीच अशी मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

- डॉ.अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव, गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र