शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

‘गाेंडवाना’चे विद्यार्थी राहणार पीजी अभ्यासक्रमांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 08:30 IST

Gadchiroli News गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा व निकालास उशीरनागपूर विद्यापीठात ४ पर्यंतच मुदत

दिगांबर जवादे

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. राज्यातील इतरही काही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुदत पुढच्या महिन्यात संपणार आहे; मात्र गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल लागेपर्यंत इतर विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशद्वार बंद होणार आहे. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Gandwana students will be deprived of PG courses)

काेराेनाच्या संकटामुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात यावर्षी गोंडवाना विद्यापीठ अजूनच माघारले. २०२०-२१ या शैक्षणिक सत्राच्या अंतिम परीक्षा गाेंडवाना विद्यापीठाने १० ऑगस्टपासून घेण्यास सुरुवात केली. ३१ ऑगस्ट राेजी शेवटचा पेपर आहे. निकाल घाेषित हाेण्यास पुन्हा एक महिन्याचा कालावधी लागेल; मात्र रा.तु.म. नागपूर विद्यापीठाने यापूर्वीच परीक्षा आटाेपल्या असून, निकालही घाेषित केले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

 

प्रवेश अर्ज भरण्यापासून राहणार वंचित

- गाेंडवाना विद्यापीठातील अनेक विद्यार्थी नागपूर विद्यापीठात प्रवेश घेण्यास इच्छुक राहतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना पदवीच्या अंतिम परीक्षेचे गुण भरावे लागतात; मात्र गाेंडवाना विद्यापीठाचे निकालच लागले नसल्याने प्रवेश अर्जात गुण भरता येणार नाही. त्यामुळे अर्जही स्वीकारला जाणार नाही.

- नागपूर विद्यापीठाबराेबरच इतरही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्याही विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येणार नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दुसरे विद्यापीठ प्रवेशासाठी मुदतवाढ देतील व गाेंडवाना विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालक करीत आहेत.

गाेंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर ३१ ऑगस्टला आहे. ५ सप्टेंबरला निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नागपूर विद्यापीठाने ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली असली तरी त्याला एक ते दीड महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. दरवर्षीच अशी मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

- डॉ.अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव, गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र