शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

‘गाेंडवाना’चे विद्यार्थी राहणार पीजी अभ्यासक्रमांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 08:30 IST

Gadchiroli News गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा व निकालास उशीरनागपूर विद्यापीठात ४ पर्यंतच मुदत

दिगांबर जवादे

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. राज्यातील इतरही काही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुदत पुढच्या महिन्यात संपणार आहे; मात्र गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल लागेपर्यंत इतर विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशद्वार बंद होणार आहे. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Gandwana students will be deprived of PG courses)

काेराेनाच्या संकटामुळे सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात यावर्षी गोंडवाना विद्यापीठ अजूनच माघारले. २०२०-२१ या शैक्षणिक सत्राच्या अंतिम परीक्षा गाेंडवाना विद्यापीठाने १० ऑगस्टपासून घेण्यास सुरुवात केली. ३१ ऑगस्ट राेजी शेवटचा पेपर आहे. निकाल घाेषित हाेण्यास पुन्हा एक महिन्याचा कालावधी लागेल; मात्र रा.तु.म. नागपूर विद्यापीठाने यापूर्वीच परीक्षा आटाेपल्या असून, निकालही घाेषित केले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

 

प्रवेश अर्ज भरण्यापासून राहणार वंचित

- गाेंडवाना विद्यापीठातील अनेक विद्यार्थी नागपूर विद्यापीठात प्रवेश घेण्यास इच्छुक राहतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना पदवीच्या अंतिम परीक्षेचे गुण भरावे लागतात; मात्र गाेंडवाना विद्यापीठाचे निकालच लागले नसल्याने प्रवेश अर्जात गुण भरता येणार नाही. त्यामुळे अर्जही स्वीकारला जाणार नाही.

- नागपूर विद्यापीठाबराेबरच इतरही विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्याही विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येणार नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. दुसरे विद्यापीठ प्रवेशासाठी मुदतवाढ देतील व गाेंडवाना विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालक करीत आहेत.

गाेंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर ३१ ऑगस्टला आहे. ५ सप्टेंबरला निकाल लावण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नागपूर विद्यापीठाने ४ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली असली तरी त्याला एक ते दीड महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. दरवर्षीच अशी मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

- डॉ.अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव, गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र