गडचिरोलीच्या आदिवासी भागात महिलांना मासिक पाळीच्या काळात सामाजिक अलिप्ततेला सामोरे जावे लागते. या काळात त्यांना 'कुर्मा घर' नावाच्या अत्यंत असुरक्षित झोपडीवजा घरात राहावे लागत होते. मात्र, गोडालवाही आणि कुपनेर या दोन गावांनी या प्रथेवर पूर्णविराम दिला आहे. या गावांमध्ये आता पारंपरिक, असुरक्षित 'कुर्मा घरां'ऐवजी आता महिलांसाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ‘पॉझिटिव्ह विश्रांती गृह’ उभारण्यात आले आहे.
'युवा परिवर्तन' आणि 'टाइम अँड टॅलेंट्स क्लब' या दोन सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे हा बदल शक्य झाला आहे. या संस्थांच्या सहकार्याने या गावांमध्ये महिलांसाठी सुरक्षित विश्रांती गृह बांधण्यात आले आहे.
सुरक्षिततेसह पर्यावरणपूरक जागा!गोडालवाही गावाची लोकसंख्या २३५ असून, यातील ३७ महिलांना मासिक पाळी येते. तर, कुपनेर या गावाची लोकसंख्या ०५ असून यात, ३५ महिला पाळी वयीन आहेत. या गावांमध्ये प्रत्येकी २६१ चौरस फूट क्षेत्रफळाची बांधण्यात आली आहेत.
विश्रांती गृहांमध्ये काय आहे खास?
महिलांसाठी बनवलेल्या या ‘पॉझिटिव्ह विश्रांती गृहां’मध्ये इको-ब्रिक्सपासून बनवलेली पलंग, धूरविरहित चूल व जाळीदार खिडक्या, सौर दिवे आणि थर्मोकोलसह स्टील छप्पर, स्वच्छ बाथरूम व टॉयलेट, वॉशबेसिन, कपडे सुकवण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
इको-ब्रिक्स म्हणजे काय?या गृहांची खासियत म्हणजे बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या इको-ब्रिक्स प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये माती भरून तयार केल्या आहेत. हे घटक केवळ पर्यावरणपूरक नाहीत, तर बांधकामालाही मजबूत बनवतात.
महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस पाऊल!या उपक्रमाबद्दल बोलताना ‘युवा परिवर्तन’चे प्रतिनिधी म्हणाले की, "हे केवळ एक वास्तूप्रकल्प नाही, तर महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि पर्यावरणीय जाणीवेच्या दिशेने उचललेलं एक सकारात्मक पाऊल आहे." या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना मासिक पाळीच्या काळात सुरक्षित, स्वच्छ जागा मिळाली आहे.