शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही; गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई करणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:15 IST

विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग : आरोग्यावरही होतो परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहनांचा कर्कश आवाज, उद्योग, प्रकल्प, मिल्स, ध्वनीक्षेपकांचा आवाज आदींमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होते. या प्रदूषणापासून सुटका व्हावी, निवांत वेळ घालवता यावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये शांतता क्षेत्र असते. परंतु गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही. त्यामुळे जोरजोरातील आवाजावर कोणाचेही नियंत्रण नाही.

गडचिरोली शहरात गत दोन वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याशिवाय शहरात अनेक उद्योग वाढल्याने त्याद्वारे ध्वनीप्रदूषणात भर पडली. दिवसभर राष्ट्रीय महामार्गाने वाहनांची वर्दळ असते. याशिवाय वाहनांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण वाढते. या प्रदूषणापासून सुटका मिळावी, निवांत विश्रांती घेता यावी, यासाठी शहरात शांतता क्षेत्र असणे गरजेचे आहे. परंतु शहरात हे क्षेत्र नसल्याने नागरिकांना कर्णकर्कश आवाजापासून सुटका करून घेण्यास अडचणी येत आहेत. 

शहरात शांतता क्षेत्र हवेगडचिरोली शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली. दिवसभर हॉर्नचा गोंगाट असतो. याशिवाय विविध कार्यक्रमांचे ध्वनीक्षेपक दिवसभर वाजत असतात. त्यामुळे नागरिकांना गोंगाटाचा सामना करावा लागतो. शहरात बगीचा वगळता विरंगुळ्याची एकही साधने नाहीत.

रुग्णांना होतो त्रास• गडचिरोली शहरातील जिल्हा १ सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालय राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. सदर महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.वाहनांच्या कर्णकर्कश• आवाजामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय जिल्हा मुख्यालयातील अनेक खासगी रुग्णालये रस्त्यालगत आहेत.रुग्णालयात भरती असलेल्या या 3 रुग्णांनाही आवाजाचा त्रास होतो. विशेष म्हणजे, शाळकरी मुलांनाही ध्वनी प्रदूषणाचा त्रास होते. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने व्यत्यय येत आहे.

कारवाई केव्हा होणार?

शहरातून मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपके वाजविली जातात. याशिवाय डीजेचा सर्रास वापर केला जातो. अशा आयोजकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक कार्यक्रमाच्या नावाखाली सुट दिली जाते. 

"शहरातून कर्णकर्कश हॉर्न असलेली वाहने सुसाट धावतात. अशा वाहनांनवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे."

- प्रफुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते.

उत्सवात डीजेचा दणदणाटविविध सण, उत्सव तसेच जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात डीजे लावून मिरवणूक काढली जाते. सदर मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटामुळे कानठिळ्या बसतात. प्रशासनाने आयोजकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

१२० वाहनांना कर्णकर्कश ध्वनीक्षेपके डेसीबलचा आवाज गोंगाटात गणला जातो. यापेक्षा कमी डेसीबल आवाज असणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष देऊन ध्वनी प्रदूषण होणार होणार नाही, नाही, याबाबत दक्षता घ्यावी. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीpollutionप्रदूषण