शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही; गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई करणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:15 IST

विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग : आरोग्यावरही होतो परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहनांचा कर्कश आवाज, उद्योग, प्रकल्प, मिल्स, ध्वनीक्षेपकांचा आवाज आदींमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होते. या प्रदूषणापासून सुटका व्हावी, निवांत वेळ घालवता यावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये शांतता क्षेत्र असते. परंतु गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही. त्यामुळे जोरजोरातील आवाजावर कोणाचेही नियंत्रण नाही.

गडचिरोली शहरात गत दोन वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याशिवाय शहरात अनेक उद्योग वाढल्याने त्याद्वारे ध्वनीप्रदूषणात भर पडली. दिवसभर राष्ट्रीय महामार्गाने वाहनांची वर्दळ असते. याशिवाय वाहनांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण वाढते. या प्रदूषणापासून सुटका मिळावी, निवांत विश्रांती घेता यावी, यासाठी शहरात शांतता क्षेत्र असणे गरजेचे आहे. परंतु शहरात हे क्षेत्र नसल्याने नागरिकांना कर्णकर्कश आवाजापासून सुटका करून घेण्यास अडचणी येत आहेत. 

शहरात शांतता क्षेत्र हवेगडचिरोली शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली. दिवसभर हॉर्नचा गोंगाट असतो. याशिवाय विविध कार्यक्रमांचे ध्वनीक्षेपक दिवसभर वाजत असतात. त्यामुळे नागरिकांना गोंगाटाचा सामना करावा लागतो. शहरात बगीचा वगळता विरंगुळ्याची एकही साधने नाहीत.

रुग्णांना होतो त्रास• गडचिरोली शहरातील जिल्हा १ सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालय राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. सदर महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.वाहनांच्या कर्णकर्कश• आवाजामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय जिल्हा मुख्यालयातील अनेक खासगी रुग्णालये रस्त्यालगत आहेत.रुग्णालयात भरती असलेल्या या 3 रुग्णांनाही आवाजाचा त्रास होतो. विशेष म्हणजे, शाळकरी मुलांनाही ध्वनी प्रदूषणाचा त्रास होते. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने व्यत्यय येत आहे.

कारवाई केव्हा होणार?

शहरातून मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपके वाजविली जातात. याशिवाय डीजेचा सर्रास वापर केला जातो. अशा आयोजकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक कार्यक्रमाच्या नावाखाली सुट दिली जाते. 

"शहरातून कर्णकर्कश हॉर्न असलेली वाहने सुसाट धावतात. अशा वाहनांनवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे."

- प्रफुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते.

उत्सवात डीजेचा दणदणाटविविध सण, उत्सव तसेच जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात डीजे लावून मिरवणूक काढली जाते. सदर मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटामुळे कानठिळ्या बसतात. प्रशासनाने आयोजकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

१२० वाहनांना कर्णकर्कश ध्वनीक्षेपके डेसीबलचा आवाज गोंगाटात गणला जातो. यापेक्षा कमी डेसीबल आवाज असणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष देऊन ध्वनी प्रदूषण होणार होणार नाही, नाही, याबाबत दक्षता घ्यावी. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीpollutionप्रदूषण