शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

चंद्रपूरच्या निर्णयामुळे गडचिरोलीला धोका; गडचिरोलीतील दारूबंदी कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 07:30 IST

Gadchiroli news गडचिरोलीच्या जनतेला व दारूबंदीला धोका निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी जिल्हा दारूमुक्ती संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून कळविले. शिवाय गडचिरोलीतील १०५० गावांनी शासनाला दारूबंदी हवीच, अशी निवेदने पाठविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयामुळे तिथल्या स्त्रियांना दुष्परिणाम भोगावे लागतील. शिवाय तिथून गडचिरोली जिल्ह्यात दारू आयात होईल. त्यामुळे गडचिरोलीच्या जनतेला व दारूबंदीला धोका निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी जिल्हा दारूमुक्ती संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून कळविले. शिवाय गडचिरोलीतील १०५० गावांनी शासनाला दारूबंदी हवीच, अशी निवेदने पाठविली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र शासन, स्वयंसेवी संस्था व गावागावातील जनता यांच्या सहयोगाने ‘मुक्तीपथ’ अभियान सुरू आहे. ‘पेसा’ कायद्याअंतर्गत ग्रामसभांना संवैधानिक अधिकार असल्याने गावातल्या लोकांनी विशेषत: महिलांनी सामूहिकरीत्या ६०० गावात दारूविक्री बंद केली आहे. १०५० गावांनी जिल्ह्यात दारूबंदी हवीच, ती अजून मजबूत करा, अशी निवेदने पाठविली. महिलांनी अहिंसक कृती करून गावातील बेकायदेशीर दारूवर आळा घातला असल्याने जिल्ह्यात दारू पिण्याचे प्रमाण दारूबंदीपूर्वीच्या तुलनेत ७० टक्के कमी झाले असल्याचे डॉ. बंग यांनी कळविले. जिल्ह्यात ४८ हजार पुरुषांनी दारू पिणे सोडले असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :liquor banदारूबंदी