शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शस्त्र चालवणाऱ्या हाती संविधान; जहाल माओवादी नेता गिरीधरचे सपत्नीक आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: June 22, 2024 20:54 IST

२८ वर्षांत १७९ गुन्हे; दाम्पत्यावर होते ५२ लाख रुपयांचे बक्षीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षली चळवळीची व्यूहरचना ज्याच्या इशाऱ्यावर चालायची तो जहाल नेता नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू याने पत्नी संगीता समवेत २२ जून रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नक्षल चळवळीत दलम सदस्य ते नक्षल नेता या २८ वर्षांच्या हिंसक प्रवासाला पूर्णविराम देत हाती संविधान घेऊन त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्याच्यावर तब्बल १७९ गुन्हे नोंद असून दाम्पत्यावर मिळून शासनाने ४२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चू याने आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

९ जुलै १९९६ मध्ये एटापल्ली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन त्याने नक्षल चळवळीत पदार्पण केले. डिसेंबर १९९७ मध्ये एटापल्ली दलममध्ये पार्टी मेंबर म्हणून त्यास बढती मिळाली. जानेवारी १९९८ मध्ये केंद्रीय समिती सदस्या सोनू याचा अंगरक्षक म्हणून काम केले. २००२ मध्येभामरागड दलममध्ये कमांडर, २००६ मध्ये डीव्हीसीएम पदावर बढती व त्यानंतर कंपनी क्र. ०४ मध्ये उप-कमांडर, फेब्रुवारी २००९ मध्ये कंपनी नं ०४ मध्ये कमांडर , मार्च २०१३ मध्ये कंपनी पार्टी कमिटी सचिव पदावर त्याने काम केले. नोव्हेंबर २०१५ मध्ये दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी सदस्य पदावर बढती व यासोबतच सब मिलिटरी कमिशन मेंबर व वेस्टर्न सबझोनल कमांडर इन चिफ म्हणून त्याने काम केले. ऑक्टोबर २०२० मध्ये दक्षिण गडचिरोली डिव्हीजन सचिव पदावर काम केले.

२०२१ मर्दीनटोला अभियान आणि उत्तर व दक्षिण गडचिरोली विभागाच्या विलीनीकरणानंतर त्याने विभागीय समितीचे प्रभारी व सचिव म्हणून काम केले. जिल्ह्यातील सीपीआय माओवाद्यांच्या संपूर्ण राजकीय व लष्कर हालचालींचा प्रभारी म्हणून तो काम करायचा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याचा पुनर्वसन बक्षीस योजनेचा धनादेश व संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, माजी खासदार अशोक नेते , पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

सी- ६० जवानांचा सन्मान

जीवाची पर्वा न करता माओवादविरोधी अभियान राबवून शौर्य दाखविणाऱ्या अधिकारी व सी -६० जवानांचा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जवानांच्या धाडसामुळेच माओवाद्यांची हिंसक चळवळ उध्दवस्थ होत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या जवानांमुळे पोलिस प्रशासनाप्रती नागरिकांचा आदर वाढत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस