शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

जहाल माओवादी 'कांताक्का', 'वारलू'चे आत्मसमर्पण, दोघांवर १८ लाखांचे होते बक्षीस

By संजय तिपाले | Updated: February 27, 2025 20:43 IST

Gadchiroli Naxal News: तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत  जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

- संजय तिपाले गडचिरोली - तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत  जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. कांतक्कावर १६ तर सुरेशवर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते, पुनर्वसनानंतर आता त्यांना अनुक्रमे साडेआठ लाख व साडेचार लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. ११ गुन्हे नोंद आहेत कांतक्कावर, तर सुरेश वारलु याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

कांता ऊर्फ कांतक्का ही ( रा. गुडंजुर (रिट) ता. भामरागड) येथील  व  सुरेश ऊर्फ वारलु हा ( रा. मिळदापल्ली ता. भामरागड) या गावचा रहिवासी आहे. कांताक्का ही विभागीय समिती सदस्य (पुरवठा टीम) तर सुरेश वारलु हा भामरागड दलममध्ये सदस्य पदावर काम करत असे. कांताक्का हिने १९९३ मध्ये  मद्देड दलममध्ये भरती होऊन नक्षल चळवळीचा प्रवास सुरु केला. १९९८ पर्यंत ती उत्तर गडचिरोलीतील प्लाटून क्र. २ मध्ये सदस्य होती. पुढे तिची भामरागड दलममध्ये बदली झाली. २००१ मध्ये तिला उपकमांडर पदी पदोन्नती मिळाली. नंतर चातगाव दलममध्ये तिने काम केले. २००६ मध्ये तिने क्षेत्रीय समिती सदस्य म्हणून पदोन्नती मिळवली. २००८ पासून ती विभागीय समिती सदस्य म्हणून  टिपागड, चातगाव व कसनसूर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये २०१५ पर्यंत तिने काम केले. २०१५मध्ये तिची माड एरियातील पुरवठा टीममध्ये बदली झाली.  

सुरेश होता राजू वेलादीचा अंगरक्षक सुरेश ऊर्फ वारलु मज्जी हा २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याने काम केले. २०२४ मध्ये त्याची विभागीय समिती सदस्य राजू वेलादी उर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. 

दोन महिन्यांत २२ जणांचे आत्मसमर्पणचालू वर्षी दोन महिन्यांत आतापर्यंत २२ माओवाद्यांनी गुन्हे प्रवासाला पूर्णविराम देत आत्मसमर्पण करुन सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान)  अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या १९२ बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी