शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

गडचिरोली आकाशवाणी केंद्राचा प्रस्ताव रखडला

By admin | Updated: March 25, 2015 01:44 IST

देशाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत रेडीओ नेटवर्क पोहोचलेले आहे. विशेषत: देशातील नक्षलप्रभावित भागात ज्या ठिकाणी अद्याप दूरचित्रवाणी प्रसारण पोहोचलेले नाही,

गडचिरोली : देशाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत रेडीओ नेटवर्क पोहोचलेले आहे. विशेषत: देशातील नक्षलप्रभावित भागात ज्या ठिकाणी अद्याप दूरचित्रवाणी प्रसारण पोहोचलेले नाही, अशा भागातही रेडीओ प्रसारण ऐकले जाते. हीच बाब लक्षात घेऊन गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केला होता. मात्र अद्याप या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गडचिरोली येथे होणारे आकाशवाणी केंद्र सध्या रखडलेले आहे.युपीए दोन सरकारच्या काळात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी लोकसभेत गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी गोंडी भाषेतून प्रसारण असलेले आकाशवाणी केंद्र सुरू केले जाणार आहे, असे सुतोवात केले होते. गडचिरोली जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र नसल्याने शासनाच्या अनेक योजना दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. तसेच गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावांत वीज नसल्याने स्ट्रँझीस्टर वापरले जातात, असे सरकारच्या निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले होते. २००९ नंतर गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या फौजा दाखल झाल्यानंतर त्यांच्या सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमातून जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावात नागरिकांना रेडीओ संच वाटप करण्याचेही काम करण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी आकाशवाणी केंद्र गडचिरोली येथे सुरू केले जाईल, अशी माहितीही दिली होती. सध्या गडचिरोली येथे एफएम रेडीओ स्टेशनचे कार्यक्रम सर्वसामान्य श्रोते ऐकतात. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पुढाकारानंतरही गडचिरोली जिल्ह्यात अजुनपर्यंत आकाशवाणी केंद्र स्थापण्याबाबत काहीही हालचाली करण्यात आलेल्या नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या सहाय्यानेच देशातील लोकांशी संवाद साधत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील आकाशवाणी केंद्राचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.