शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली आकाशवाणी केंद्राचा प्रस्ताव रखडला

By admin | Updated: March 25, 2015 01:44 IST

देशाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत रेडीओ नेटवर्क पोहोचलेले आहे. विशेषत: देशातील नक्षलप्रभावित भागात ज्या ठिकाणी अद्याप दूरचित्रवाणी प्रसारण पोहोचलेले नाही,

गडचिरोली : देशाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत रेडीओ नेटवर्क पोहोचलेले आहे. विशेषत: देशातील नक्षलप्रभावित भागात ज्या ठिकाणी अद्याप दूरचित्रवाणी प्रसारण पोहोचलेले नाही, अशा भागातही रेडीओ प्रसारण ऐकले जाते. हीच बाब लक्षात घेऊन गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केला होता. मात्र अद्याप या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे गडचिरोली येथे होणारे आकाशवाणी केंद्र सध्या रखडलेले आहे.युपीए दोन सरकारच्या काळात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी लोकसभेत गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी गोंडी भाषेतून प्रसारण असलेले आकाशवाणी केंद्र सुरू केले जाणार आहे, असे सुतोवात केले होते. गडचिरोली जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र नसल्याने शासनाच्या अनेक योजना दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. तसेच गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावांत वीज नसल्याने स्ट्रँझीस्टर वापरले जातात, असे सरकारच्या निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले होते. २००९ नंतर गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या फौजा दाखल झाल्यानंतर त्यांच्या सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमातून जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावात नागरिकांना रेडीओ संच वाटप करण्याचेही काम करण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी आकाशवाणी केंद्र गडचिरोली येथे सुरू केले जाईल, अशी माहितीही दिली होती. सध्या गडचिरोली येथे एफएम रेडीओ स्टेशनचे कार्यक्रम सर्वसामान्य श्रोते ऐकतात. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पुढाकारानंतरही गडचिरोली जिल्ह्यात अजुनपर्यंत आकाशवाणी केंद्र स्थापण्याबाबत काहीही हालचाली करण्यात आलेल्या नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या सहाय्यानेच देशातील लोकांशी संवाद साधत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील आकाशवाणी केंद्राचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.