शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का

By संजय तिपाले | Updated: April 25, 2023 10:43 IST

चौघांवर आज अंत्यसंस्कार : खंजीर भजन स्पर्धेत मिळवली अनेक बक्षीसे

गडचिरोली : 'आमुचा तू आमुचा तू सवंगडी.. परी करीशी तू आपली खोडी.. हरी तुझ्या खेळाचे भय वाटे..' अशा भजनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारत राजगडे यांचे स्वर मुके झाले आणि त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडाले. भारत राजगडे ( ३७) यांच्यासह पत्नी अंकिता (३०) तसेच देव्यांशी (५) व मनस्वी (३) या चिमुकल्यांचा कुरखेडा- देसाईगंज मार्गावरील तुळशीफाटा येथे २४ एप्रिलला सायंकाळी वीज कोसळून मृत्यू झाला.

सासरवाडीतील लग्नसमारंभ आटोपून दुचाकीवरून परतताना पाऊस सुरु झाल्याने ते झाडाखाली थांबले अन तेथेच या सर्व निष्पाप कुटुंबाला मृत्यूने गाठले. भारत राजगडे यांनी भजनी मंडळ स्थापन करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत बक्षीसे पटकावली होती. शिवाय नाटकांमध्ये गायनाचे कामही ते करत.

लग्नाहून घरी परतताना अंगावर वीज कोसळली; दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चाैघांचा दुर्दैवी मृत्यू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भजने गाऊन त्यांनी देसाईगंज तालुक्यासह परिसरात नावलौकिक मिळवला होता. त्यांच्यासह पत्नी, दोन मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची घटना समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी गायलेल्या भजनांच्या चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.  त्यांच्या जाण्याने रसिकांनी शोक व्यक्त केला.

अवघ्या तीन किलोमीटरवर होते गाव, तेवढ्यात नियतीने साधला डावआज होणार अंत्यसंस्कार

२५ एप्रिलला सकाळी उत्तरीय तपासणी करून चौघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. भारत राजगडेंसह चौघांवर आमगाव बुट्टी (ता. देसाईगंज) येथे  वैनगंगा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली