शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

Gadchiroli: मकरसंक्रांतीचे वाण देऊन शेतात गेली अन वाघाच्या तावडीत सापडली, जिल्ह्यात १५ दिवसांत तिसरा बळी

By संजय तिपाले | Updated: January 15, 2024 22:47 IST

Gadchiroli News: मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी- कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. नव्या वर्षात व्याघ्रसंकट अधिक गडद होत चालले असून १५ दिवसांतील हा तिसरा बळी आहे. 

- संजय तिपाले गडचिरोली - मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी- कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. नव्या वर्षात व्याघ्रसंकट अधिक गडद होत चालले असून १५ दिवसांतील हा तिसरा बळी आहे. 

रमाबाई शंकर मुंजनकर (५५, रा. कोळसापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. सोमवारी मकरसंक्रांतीच्या सणासाठी त्या घरी होत्या. सण आटोपून त्या सायंकाळी ५ वाजता गावालगतच्या स्वतःच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. मार्कंडा वनपरिक्षेतत्राला चिकटून शेत असून तेथे आधीच वाघ दडून बसलेला होता. या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्या मृत्युमुखी पडल्या. रात्री सात वाजेनंतरही त्या घरी न परतल्याने कुटुंबाने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. यावरून हल्ल्यांनंतर वाघाने रमाबाई मुंजनकर यांना फरफटत जंगलात नेले असावे, असा कयास बांधला जात आहे. मयत रमाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, मूलचेरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी चमूसह धाव घेतली. गडचिरोली, अहेरीनंतर मूलचेरातही बळीजिल्ह्यात गतवर्षी वाघाने सहा जणांचा बळी घेतला होता. यंदा १५ दिवसांत तीन बळी गेले आहेत. ३ जानेवारीला गडचिरोलीजवळील वाकडी जंगलात महिलेला ठार केले होते, ७ जानेवारीला अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे कापूस वेचताना महिलेवर हल्ला करून बळी घेतला होता तर १५ जानेवारीला मूलचेरा तालुक्यातही वाघाने महिलेस ठार मारले. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष अधिक टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली