शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अतिक्रमणधारकांना आता मिळणार हक्काचे छत; ठिय्या आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:36 IST

मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन : १९० झोपड्यांवर फिरवला होता बुलडोजर

गडचिराेली : शहराच्या गाेकुलनगरातील एकता नगर झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ज्या नागरिकांच्या १९० झोपड्या अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत बुलडोजर लावून उद्ध्वस्त केल्या. त्या सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक-३ अंतर्गत घरे बांधून देण्याचे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील झोपडपट्टीधारकांच्या ठिय्या आंदोलनकर्त्याना शुक्रवारी दोन दिवसांनंतर स्थानिक न. प. प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याने झोपडपट्टीधारकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदाेलनावर अखेर ताेडगा निघाला.

सदर अतिक्रमित सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक -३ अंतर्गत घरे बांधून देण्याचे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील झोपडपट्टीधारकांच्या ठिय्या आंदोलनकर्त्याना देण्यात आल्याची माहिती २३ जूनला नगरपरिषद सभागृहात नगरपरिषद व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे पंतप्रधान आवास योजनेचे प्रमुख अंकुश भालेराव, झोपडपट्टी आंदोलनाचे प्रमुख तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, महिला आघाडीच्या प्रवक्त्या माला भजगवळी, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, मीडिया प्रमुख जावेद शेख, विपीन सूर्यवंशी, शकुंतला दुधे, शशिकला शेरकी, वंदना येडमे, सुजाता दुधे, शिल्पा वासनिक, कवडू दुधे आदी उपस्थित होते. दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत घरकुल बांधून देण्याचे लेखी पत्र झोपडपट्टी आंदोलकांना देण्यात आले आहे तसेच अतिक्रमण हटविताना झालेल्या नुकसानीच्या संदर्भाने चौकशी करून अहवाल तयार करून निर्णय घेतल्या जाईल, उपमुख्याधिकारी भंडारवार यांनी सांगितले.

'लोकमत'ने वेधले लक्ष

अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान गोरगरीब व वंचित कुटुंबांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवून त्यांचे संसारोपयोगी साहित्य उचलून नेल्याने बेघर होण्याची वेळ आली होती. 'लोकमत'ने स्पॉट रिपोर्टिंग करून अतिक्रमणधारकांच्या व्यथांना वाचा फोडून लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

गोरगरिब लाेकसुद्धा या देशाचे नागरिक आहेत त्यांना असणाऱ्या संविधानिक हक्क आणि अधिकाराची पायमल्ली होता कामा नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेऊन मानवतावादाचे हनन थांबविले पाहिजे. अन्यायाच्या विरोधात वंचितचे सगळे पदाधिकारी झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने झोपडपट्टीधारकांच्या मागण्या लेखी पत्र देऊन मान्य केल्या आहेत हे आमच्या आंदोलनाचे यश आहे.

- बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

--

टॅग्स :SocialसामाजिकEnchroachmentअतिक्रमणGadchiroliगडचिरोली