शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अतिक्रमणधारकांना आता मिळणार हक्काचे छत; ठिय्या आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:36 IST

मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन : १९० झोपड्यांवर फिरवला होता बुलडोजर

गडचिराेली : शहराच्या गाेकुलनगरातील एकता नगर झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ज्या नागरिकांच्या १९० झोपड्या अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत बुलडोजर लावून उद्ध्वस्त केल्या. त्या सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक-३ अंतर्गत घरे बांधून देण्याचे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील झोपडपट्टीधारकांच्या ठिय्या आंदोलनकर्त्याना शुक्रवारी दोन दिवसांनंतर स्थानिक न. प. प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य झाल्याने झोपडपट्टीधारकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदाेलनावर अखेर ताेडगा निघाला.

सदर अतिक्रमित सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक क्रमांक -३ अंतर्गत घरे बांधून देण्याचे लेखी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वातील झोपडपट्टीधारकांच्या ठिय्या आंदोलनकर्त्याना देण्यात आल्याची माहिती २३ जूनला नगरपरिषद सभागृहात नगरपरिषद व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे पंतप्रधान आवास योजनेचे प्रमुख अंकुश भालेराव, झोपडपट्टी आंदोलनाचे प्रमुख तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, महिला आघाडीच्या प्रवक्त्या माला भजगवळी, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, मीडिया प्रमुख जावेद शेख, विपीन सूर्यवंशी, शकुंतला दुधे, शशिकला शेरकी, वंदना येडमे, सुजाता दुधे, शिल्पा वासनिक, कवडू दुधे आदी उपस्थित होते. दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनेअंतर्गत घरकुल बांधून देण्याचे लेखी पत्र झोपडपट्टी आंदोलकांना देण्यात आले आहे तसेच अतिक्रमण हटविताना झालेल्या नुकसानीच्या संदर्भाने चौकशी करून अहवाल तयार करून निर्णय घेतल्या जाईल, उपमुख्याधिकारी भंडारवार यांनी सांगितले.

'लोकमत'ने वेधले लक्ष

अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान गोरगरीब व वंचित कुटुंबांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवून त्यांचे संसारोपयोगी साहित्य उचलून नेल्याने बेघर होण्याची वेळ आली होती. 'लोकमत'ने स्पॉट रिपोर्टिंग करून अतिक्रमणधारकांच्या व्यथांना वाचा फोडून लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

गोरगरिब लाेकसुद्धा या देशाचे नागरिक आहेत त्यांना असणाऱ्या संविधानिक हक्क आणि अधिकाराची पायमल्ली होता कामा नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेऊन मानवतावादाचे हनन थांबविले पाहिजे. अन्यायाच्या विरोधात वंचितचे सगळे पदाधिकारी झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने झोपडपट्टीधारकांच्या मागण्या लेखी पत्र देऊन मान्य केल्या आहेत हे आमच्या आंदोलनाचे यश आहे.

- बाळू टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

--

टॅग्स :SocialसामाजिकEnchroachmentअतिक्रमणGadchiroliगडचिरोली