शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

यंदाही गडचिरोली जिल्हा मलेरियाच्या कचाट्यात; चार महिन्यांत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 13:51 IST

मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या तालुक्यांत भामरागड तालुक्याचा राज्यात पहिला क्रमांक लागतो.

ठळक मुद्देराज्यात सर्वाधिक रुग्ण

गडचिरोली : मलेरियाचे राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीही ही स्थिती कायम आहे. किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा ही यावर्षी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे. आरोग्य विभागाकडून मलेरियाला नियंत्रित ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात, मात्र स्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश येताना दिसत नाही.

जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे १९७६ रुग्ण आढळले आहेत. त्यातून ३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी याच काळात १११० रुग्ण आढळले होते. त्यावरून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मलेरियाचा प्रकोप जास्त असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या ४ महिन्यांत मलेरियाचा उद्रेक सर्वाधिक होतो. गेल्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार ३२६ रुग्ण मलेरियाग्रस्त होऊन त्यातील ८ रुग्ण दगावले होते. 

फेब्रुवारी आणि मार्च २०२२ या दोन महिन्यांत ६५९ संवेदनशील गावांमध्ये हिवताप सर्वेक्षण मोहीम राबवून प्रत्येक कुटुंबातून रक्त नमुने घेऊन तपासले. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्या यावर्षी जास्त दिसत असल्याचे हिवताप नियंत्रण विभागाने स्पष्ट केले.

दोन लाख मच्छरदाण्यांचे वाटप

डासांपासून मलेरिया पसरत असल्यामुळे डासांना दूर ठेवण्यासाठी गेल्या वर्षी (२०२१) तब्बल ५९४ गावांमध्ये १ लाख ९७ हजार ४८० मच्छरदाण्यांचे निशुल्क वाटप करण्यात आले, पण त्यांचा वापर झोपताना डासांपासून संरक्षण करण्यासाठी न करता अनेक लोक मासे पकडण्यासाठी करतात. याशिवाय दुर्गम भागातील लोक अंगावर कमी कपडे ठेवतात. त्यामुळे दिवसाही त्यांना डासांचा दंश होऊन मलेरियाचे जंतू त्यांच्या अंगात पसरतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

भामरागड तालुका राज्यात अग्रेसर

मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या तालुक्यांत भामरागड तालुक्याचा राज्यात पहिला क्रमांक लागतो. या तालुक्यात गेल्या चार महिन्यांत ११४४ रुग्ण आढळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या तुलनेत या तालुक्यात मलेरियाचे प्रमाण ५७ टक्के आहे. केवळ साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होते असे नाही तर जंगलातही डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रात ७६ टक्के जंगल आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळतात, झोपडी वजा घरांमुळे डास नाशक फवारणीचा ही फारसा उपयोग होत नाही, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यgadchiroli-acगडचिरोली