शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने तीन घरं कोसळली; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देमहागावातील दोन तर अहेरीतील एक घर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे.महागाव येथील शिवकुमार राजेश जनगम यांचे राहते घर शुक्रवारी ( दि. २३) पहाटे ४ वाजता कोसळले. घर कोसळत असतांना राजेश यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुले घरातच होती. घर कोसळले त्यावेळी सर्व जण आतमध्ये असल्याने त्यांना बाहेरही पडता आले नाही. मात्र नशीब बलवत्तर असल्याने एवढ्या मोठ्या अपघातातुन सर्व बचावले आहेत. मात्र त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आला आहे.महागाव येथीलच महादेव गंगा वेलादी यांचा परिवार झोपेत असतांना मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने ही भिंत बाहेरील बाजूस पडल्याने इथेही जीवितहानी झाली नाही. महागावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय अलोणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती महसूल विभागास दिली.तिसरी घटना अहेरी येथील गडअहेरी परिसरात घडली असून गडअहेरी मुरूमखदान येथील हिमवंत सत्यनारायण पस्पुनूरवार यांचे घर ही मुसळधार पावसाने कोसळले. यात कोणतीच जीवितहानी झाली नाही. महसूल विभागाने मदत करावी अशी मागणी अतिवृष्टीग्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस