शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने तीन घरं कोसळली; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देमहागावातील दोन तर अहेरीतील एक घर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे.महागाव येथील शिवकुमार राजेश जनगम यांचे राहते घर शुक्रवारी ( दि. २३) पहाटे ४ वाजता कोसळले. घर कोसळत असतांना राजेश यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुले घरातच होती. घर कोसळले त्यावेळी सर्व जण आतमध्ये असल्याने त्यांना बाहेरही पडता आले नाही. मात्र नशीब बलवत्तर असल्याने एवढ्या मोठ्या अपघातातुन सर्व बचावले आहेत. मात्र त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आला आहे.महागाव येथीलच महादेव गंगा वेलादी यांचा परिवार झोपेत असतांना मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने ही भिंत बाहेरील बाजूस पडल्याने इथेही जीवितहानी झाली नाही. महागावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय अलोणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती महसूल विभागास दिली.तिसरी घटना अहेरी येथील गडअहेरी परिसरात घडली असून गडअहेरी मुरूमखदान येथील हिमवंत सत्यनारायण पस्पुनूरवार यांचे घर ही मुसळधार पावसाने कोसळले. यात कोणतीच जीवितहानी झाली नाही. महसूल विभागाने मदत करावी अशी मागणी अतिवृष्टीग्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस