शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

गडचिरोली शहराचा पाणी पुरवठा ठप्प

By admin | Updated: September 6, 2016 00:50 IST

स्थानिक नगर पालिकेच्या वतीने गडचिरोली नजीकच्या वैनगंगा नदीवर बसविण्यात आलेल्या नळ योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो.

गृहिणी त्रस्त : फिल्टर प्लॅन्टवरील दोन्ही मोटार जळाल्यागडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या वतीने गडचिरोली नजीकच्या वैनगंगा नदीवर बसविण्यात आलेल्या नळ योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. बोरमाळा मार्गावर असलेल्या पालिकेच्या फिल्टर प्लॅन्टवरील नळ पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही विद्युत मोटारी जळाल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाण्यासाठी गृहिणींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोली पालिकेच्या वतीने शहरातील सर्वच २३ वॉर्डात पाणी पुरवठा करण्यासाठी सात जलकुंभ तयार करण्यात आले आहे. याशिवाय बोरमाळा मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याचे शुध्दीकरण झाल्यावर विद्युत मोटारच्या सहाय्याने शहरातील जलकुंभांमध्ये पाणी पुरवठा केला जातो. तिथून नळाद्वारे नागरिकांना पाणी दिले जाते. सदर फिल्टर प्लॅन्टवरील पाणी पुरवठा करणारी एक मोटार चार दिवसांपूर्वी जळाली. त्यामुळे एकाच विद्युत मोटारच्या सहाय्याने शहराच्या अर्ध्या भागाला पाणी पुरवठा सुरू होता. यात पुन्हा रविवारी दुसरी विद्युत मोटार जळाली. त्यामुळे शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा बंद झाला. या संदर्भात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सोनटक्के यांना विचारणा केली असता, नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लॅन्टवरील दोन्ही विद्युत मोटार जळाल्या. एक मोटार पूर्वीच जळाली होती. दुसरी रविवारी जळाली. सदर मोटार दुरूस्तीसाठी नागपूरच्या तंत्रज्ञाकडे पाठविण्यात आली आहे. मंगळवारी दुरूस्ती होऊन विद्युत मोटार गडचिरोलीत पोहोचणार आहे. त्यानंतर मंगळवारच्या सायंकाळपासून गडचिरोली शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेरावशहरातील नगर पालिकेची पाणी पुरवठा योजना मागील सहा महिन्यांपासून कुचकामी ठरलेली आहे. शहराला नियमितपणे पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याच्या कारणावरून शहरात दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र पावसाळ्यात नदी पात्रात मुबलक पाणी असताना सुध्दा शहरात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ शहरातील अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अन्यथा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या सुषमा येवले यांनी दिला आहे.