शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली शहराचा पाणी पुरवठा ठप्प

By admin | Updated: September 6, 2016 00:50 IST

स्थानिक नगर पालिकेच्या वतीने गडचिरोली नजीकच्या वैनगंगा नदीवर बसविण्यात आलेल्या नळ योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो.

गृहिणी त्रस्त : फिल्टर प्लॅन्टवरील दोन्ही मोटार जळाल्यागडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या वतीने गडचिरोली नजीकच्या वैनगंगा नदीवर बसविण्यात आलेल्या नळ योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. बोरमाळा मार्गावर असलेल्या पालिकेच्या फिल्टर प्लॅन्टवरील नळ पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही विद्युत मोटारी जळाल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाण्यासाठी गृहिणींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोली पालिकेच्या वतीने शहरातील सर्वच २३ वॉर्डात पाणी पुरवठा करण्यासाठी सात जलकुंभ तयार करण्यात आले आहे. याशिवाय बोरमाळा मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याचे शुध्दीकरण झाल्यावर विद्युत मोटारच्या सहाय्याने शहरातील जलकुंभांमध्ये पाणी पुरवठा केला जातो. तिथून नळाद्वारे नागरिकांना पाणी दिले जाते. सदर फिल्टर प्लॅन्टवरील पाणी पुरवठा करणारी एक मोटार चार दिवसांपूर्वी जळाली. त्यामुळे एकाच विद्युत मोटारच्या सहाय्याने शहराच्या अर्ध्या भागाला पाणी पुरवठा सुरू होता. यात पुन्हा रविवारी दुसरी विद्युत मोटार जळाली. त्यामुळे शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा बंद झाला. या संदर्भात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सोनटक्के यांना विचारणा केली असता, नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लॅन्टवरील दोन्ही विद्युत मोटार जळाल्या. एक मोटार पूर्वीच जळाली होती. दुसरी रविवारी जळाली. सदर मोटार दुरूस्तीसाठी नागपूरच्या तंत्रज्ञाकडे पाठविण्यात आली आहे. मंगळवारी दुरूस्ती होऊन विद्युत मोटार गडचिरोलीत पोहोचणार आहे. त्यानंतर मंगळवारच्या सायंकाळपासून गडचिरोली शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेरावशहरातील नगर पालिकेची पाणी पुरवठा योजना मागील सहा महिन्यांपासून कुचकामी ठरलेली आहे. शहराला नियमितपणे पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याच्या कारणावरून शहरात दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र पावसाळ्यात नदी पात्रात मुबलक पाणी असताना सुध्दा शहरात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ शहरातील अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अन्यथा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या सुषमा येवले यांनी दिला आहे.