शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

गडचिरोली शहर कडकडीत बंद; जनता कर्फ्यूची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:59 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गडचिरोलीतील व्यापारी वर्ग व लोकप्रतिनिधींनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील संपूर्ण बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद होती.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गडचिरोलीतील व्यापारी वर्ग व लोकप्रतिनिधींनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील संपूर्ण बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद होती. केवळ औषधी दुकाने, पेट्रोल पंप, बँका आणि सरकारी कार्यालये वगळता बहुतांश व्यवहार बंदच होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जनता कर्फ्यूमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर सकाळपासून वर्र्दळ नव्हती. केवळ सरकारी कर्मचारी कार्यालयात जाताना दिसत होते. बँकांमधील गर्दीही नेहमीप्रमाणे नव्हते. बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील काही कर्मचारीही कोरोनाबधित झाल्याने ही शाखा दोन दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना गोंडवाना विद्यापीठातील शाखेत धाव घ्यावी लागली. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आ.डॉ.देवराव होळी व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काही भागात फिरून परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आतापर्यंत १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. अजून १७ जणांना तीव्र स्वरूपात लक्षणे असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या वर गेला आहे. दैनंदिन स्वरूपातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी जनता कर्फ्यू आणि नियमांचे पालन करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याची भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरी आलेल्या पथकाला सहकार्य करून आरोग्यविषयक माहिती द्या, तसेच त्यांना तपासणीस सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले.

सूचनांचे पालन करागरज असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून दिलेल्या सूचनांचे पालन करा. यामध्ये मास्क लावणे, शारीरिक आंतर राखणे, कोरोनाची लक्षणे असल्यास आरोग्य विभागाला संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांच्या सहभागाशिवाय संसर्ग रोखणे शक्य नाही. त्याकरिता प्रत्येकाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी केले.

आरमोरी-कोरचीतही जनता कर्फ्यूच्या हालचालीगडचिरोलीपाठोपाठ आरमोरी आणि कोरची येथेही जनता कर्फ्यू पाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात सर्वपक्षीय नेते आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासंदर्भात बैठकही झाली असून हा जनता कर्फ्यू कधी सुरू करायचा, कशा पद्धतीने पाळायचा यावर चर्चा झाली. दरम्यान आरमोरी नगर परिषद कार्यालयातील चार कर्मचारी एक कंत्राटदार पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. नगर परिषद कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरची येथे बुधवारी तहसीलदार, नायब तहसीलदार, नगर पंचायत कर्मचारी, व्यापारी व गावकऱ्यांची बैठक बाजार चौकातील हनुमान मंदिरात झाली. त्यात २६ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ ऑक्टोबरपर्यंत हा कर्फ्यू ठेवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी नागरिकांना नियमांचे पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करावी लागेल, अशी तंबी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस