शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

गडचिरोलीतील अगरबत्ती प्रकल्प टाकणार कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 18:11 IST

गडचिरोलीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अगरबत्ती प्रकल्पांच्या कामाला अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

गडचिरोली - गडचिरोलीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अगरबत्ती प्रकल्पांच्या कामाला अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याची जबाबदारी आता राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे सोपविण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. राज्याच्या टोकावरील आणि वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 2012 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांच्या पुढाकाराने 46 अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्यात आले होते.

बांबू आणि बांबूवर आधारित अशा छोट्या उद्योगातून रोजगार निर्मिती करण्यासाठी त्याचे नियंत्रण व देखभालीची जबाबदारी वनविभागाकडे दिली होती. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर घोट, भामरागड, सिरोंचा, देऊळगांव व पोर्ला येथे, नंतर इतर ठिकाणी अशा एकूण 46 अगरबत्ती प्रकल्पांची सुरूवात करून बेरोजगार युवक आणि महिलांना रोजगारासाठी संधी देण्यात आली. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षितपणाने दोन वर्षातच त्या प्रकल्पांची वाताहात झाली. आता या अगरबत्ती प्रकल्पांना नव्याने संचालित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कुरखेडा, चामोर्शी तालुक्यातील घोट आणि आलापल्ली येथील एक अशा तीन अगरबत्ती प्रकल्पांचे हस्तांतरण महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे करण्याचा शासन आदेश गुरूवारी (8 फेब्रुवारी) जारी करण्यात आला.

 12 सदस्यांची समितीप्रकल्पाच्या योग्य व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यात गडचिरोली वनवृत्तचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पाचही वन विभागांचे उपवनसंरक्षक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आणि अगरबत्ती क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी एक व्यक्ती यांचा समावेश राहणार आहे. बेरोजगारांच्या हातांना काम देणारे हे प्रकल्प आतातरी सुस्थितीत येतील अशी आशा बळावली आहे.