शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे गडचिरोली पुन्हा बनले केंद्र

By admin | Updated: February 3, 2015 22:54 IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला.

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला. या आंदोलनाची मशाल अहेरी राजनगरीतून कायम प्रज्वलित ठेवण्याचे काम राजे विश्वेश्वरराव महाराज व राजे सत्यवानराव महाराज यांनी केले. त्यानंतर आता पुन्हा विदर्भ गर्जना यात्रेच्या निमित्ताने गडचिरोली आंदोलनाचा केंद्रबिंदू झाली आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्या पूर्वीपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी अहेरी ते नागपूर पदयात्राही काढली होती. विदर्भाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग राहायचा. ते कायम विदर्भवादी राहिलेत. त्यानंतर राजे सत्यवान महाराजांनीही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला घेऊन अनेक आंदोलने केलीत व ही मागणी कायम ठेवली. गडचिरोली या काळात विदर्भ आंदोलनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर शहरात ही चळवळ पुढे वाढत गेली. परंतु गेल्या चार-पाच वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात गडचिरोली हा मुख्य केंद्र बिंदू ठरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास गडचिरोलीच्या साधन संपत्तीवर हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा दावा विदर्भवादी नेते करीत आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलनात गडचिरोलीची भूमिका अग्रभागी राहिली आहे. यंदा पुन्हा सिंदखेड राजा ते गडचिरोली अशी विदर्भ गर्जना यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेचा समारोप गडचिरोली येथे ३ मार्च रोजी होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. यात्रा कालेश्वरपर्यंत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कालेश्वर तेलंगणा राज्यात येते. गेल्यावर्षी स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण झाले. विदर्भाची मागणी जुनी असूनही शासनकर्त्यांनी विदर्भावर अन्याय केला, अशी भावना या भागातील जनतेची आहे. मागास भागाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)