शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे गडचिरोली पुन्हा बनले केंद्र

By admin | Updated: February 3, 2015 22:54 IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला.

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला. या आंदोलनाची मशाल अहेरी राजनगरीतून कायम प्रज्वलित ठेवण्याचे काम राजे विश्वेश्वरराव महाराज व राजे सत्यवानराव महाराज यांनी केले. त्यानंतर आता पुन्हा विदर्भ गर्जना यात्रेच्या निमित्ताने गडचिरोली आंदोलनाचा केंद्रबिंदू झाली आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्या पूर्वीपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी अहेरी ते नागपूर पदयात्राही काढली होती. विदर्भाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग राहायचा. ते कायम विदर्भवादी राहिलेत. त्यानंतर राजे सत्यवान महाराजांनीही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला घेऊन अनेक आंदोलने केलीत व ही मागणी कायम ठेवली. गडचिरोली या काळात विदर्भ आंदोलनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर शहरात ही चळवळ पुढे वाढत गेली. परंतु गेल्या चार-पाच वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात गडचिरोली हा मुख्य केंद्र बिंदू ठरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास गडचिरोलीच्या साधन संपत्तीवर हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा दावा विदर्भवादी नेते करीत आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलनात गडचिरोलीची भूमिका अग्रभागी राहिली आहे. यंदा पुन्हा सिंदखेड राजा ते गडचिरोली अशी विदर्भ गर्जना यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेचा समारोप गडचिरोली येथे ३ मार्च रोजी होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. यात्रा कालेश्वरपर्यंत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कालेश्वर तेलंगणा राज्यात येते. गेल्यावर्षी स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण झाले. विदर्भाची मागणी जुनी असूनही शासनकर्त्यांनी विदर्भावर अन्याय केला, अशी भावना या भागातील जनतेची आहे. मागास भागाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)