शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे गडचिरोली पुन्हा बनले केंद्र

By admin | Updated: February 3, 2015 22:54 IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला.

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला. या आंदोलनाची मशाल अहेरी राजनगरीतून कायम प्रज्वलित ठेवण्याचे काम राजे विश्वेश्वरराव महाराज व राजे सत्यवानराव महाराज यांनी केले. त्यानंतर आता पुन्हा विदर्भ गर्जना यात्रेच्या निमित्ताने गडचिरोली आंदोलनाचा केंद्रबिंदू झाली आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्या पूर्वीपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी अहेरी ते नागपूर पदयात्राही काढली होती. विदर्भाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग राहायचा. ते कायम विदर्भवादी राहिलेत. त्यानंतर राजे सत्यवान महाराजांनीही स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला घेऊन अनेक आंदोलने केलीत व ही मागणी कायम ठेवली. गडचिरोली या काळात विदर्भ आंदोलनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर शहरात ही चळवळ पुढे वाढत गेली. परंतु गेल्या चार-पाच वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात गडचिरोली हा मुख्य केंद्र बिंदू ठरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास गडचिरोलीच्या साधन संपत्तीवर हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा दावा विदर्भवादी नेते करीत आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलनात गडचिरोलीची भूमिका अग्रभागी राहिली आहे. यंदा पुन्हा सिंदखेड राजा ते गडचिरोली अशी विदर्भ गर्जना यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेचा समारोप गडचिरोली येथे ३ मार्च रोजी होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. यात्रा कालेश्वरपर्यंत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कालेश्वर तेलंगणा राज्यात येते. गेल्यावर्षी स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण झाले. विदर्भाची मागणी जुनी असूनही शासनकर्त्यांनी विदर्भावर अन्याय केला, अशी भावना या भागातील जनतेची आहे. मागास भागाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)