शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीकरांना न कळलेले ‘आबा’

By admin | Updated: February 19, 2015 01:39 IST

गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची धुरा स्वत:हून अंगावर घेणाऱ्या आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीचा लौकिक राज्याच्या कानाकोपऱ्यात वाढविला.

गडचिरोली : गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची धुरा स्वत:हून अंगावर घेणाऱ्या आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीचा लौकिक राज्याच्या कानाकोपऱ्यात वाढविला. याची प्रचिती त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून व्यक्त झालेल्या शोक संवेदनातून दिसून आली. मात्र आबांची असलेली सकारात्मक विकासाची संकल्पना या जिल्ह्यातल्या कोणत्याच लोकप्रतिनिधीला आत्मसात करता आली नाही. याची खंत अनेकांना आजही लागून आहे. आबांनी या जिल्ह्यासाठी आणलेल्या विकास निधीतही वाटपावरून वाद न्यायालयापर्यंत नेण्यात आले. यावरूनच आबांनी या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींची मानसिकता ओळखली हेही अनेकदा त्यांनी जाहीररित्या बोलून दाखविले होते. एका वजनदार राजकीय नेतृत्त्वाने जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यामुळे गडचिरोलीच्या विकासाला एक सकारात्मक आयाम देण्याचा काम त्यांच्या माध्यमातून झाले. कधी नव्हे ते गडचिरोलीच्या विकास कामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला. गावागावात विकास काम सुरू झाले पाहिजे म्हणून ग्रामपंचायतींना विकास कामे करण्याचे अधिकार दिले. जिल्हा परिषदेला जिल्हा विकास निधीतूनही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला. पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी जसे विकासाची संकल्पना राबवितात व आपल्या गावांचा विकास करतात, तसा गडचिरोलीच्या स्थानिक नेत्यांनी करावा, अशी आबांची कायम मनिषा होती. परंतु आबांची ही इच्छा शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. याची खंत आजही अनेकांना आहे.जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीवरून वाद होऊन वाटपाचे प्रकरण न्यायालयात गेले. जी विकास कामे झाली, तिच्या दर्जाविषयी आबा नेहमी चिंतेच्या स्वरात जाहीररित्या बोलत. कंत्राटदारांच्या कामांचा दर्जा तपासा असे ते सातत्याने सांगत राहिले. पोर्ला आरोग्य केंद्राच्या उद्घाटनालाही त्यांनी हीच बाब प्रकर्षाने मांडली. गडचिरोलीकरांना आबा खऱ्या अर्थाने समजलेच नाही. ते अधिकाऱ्यांचेच ऐकतात, असा अनेकदा आक्षेपही त्यांच्यावर नोंदविण्यात आला. परंतु आबा नेहमी अढळ राहीले व गडचिरोलीच्या विकासाची चिंता त्यांनी कायम वाहिली. या जिल्ह्यातला दुर्गम भागातील विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी त्यांच्यामुळेच शिक्षणासाठी जाऊ शकला. या जिल्ह्यात अनेक नव्या देखण्या इमारती उभ्या करण्यात आबांचे फार मोठे योगदान आहे. हा जिल्हा आबांचे ऋण कधीही भरून काढू शकणार नाही, एवढे काम त्यांनी या जिल्ह्यात केले. (जिल्हा प्रतिनिधी)