शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 10:32 IST

पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण प्रयत्न

गडचिराेली : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘फुलाेरा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.

जिल्ह्यातील ५० टक्के शाळा आदिवासीबहुल भागात आहेत. काही विद्यार्थ्यांची मातृभाषा गाेंडी, माडिया, छत्तीसगडी, तेलगू, बंगाली आहे. या विद्यार्थ्यांना मराठी समजत नाही. या विद्यार्थ्यांच्या बाेलीभाषेचा वापर करीत अध्यापन करणे व त्यांना प्रमाणित मराठी भाषा शिकविणे, गणितीय प्रक्रिया सहज साेपी करण्यासाठी अधिकाधिक शैक्षणिक साहित्याचा वापर करणे या उद्देशाने फुलाेरा उपक्रमाची सुरुवात २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात करण्यात आली. सुरुवातीला ३३६ शाळांमध्ये हा उपक्रम प्रायाेगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३४३ शाळांची निवड झाली. सद्यस्थितीत ६७९ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. जून २०२२ अखेरपर्यंत एक हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने जिल्ह्यातील काही निवडक शाळांना भेट देऊन गुुणवत्तेची तपासणी केली असता, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला असल्याचे दिसून आले. त्यानंतर या उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

वर्ग झाले बालभवनात रूपांतरित

अध्ययनासाठी शैक्षणिक साहित्य हा अतिशय महत्त्वाचा भाग असला तरी, हे साहित्य शाळेतील एखाद्या कपाटात ठेवले जाते. गरज पडेल तेव्हाच ते काढले जाते. फुलाेरा उपक्रमाअंतर्गत बालभवन निर्माण करण्यात आले आहे. वर्गखाेलीलाच बालभवन असे नाव दिले आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी तयार केलेले सर्व शैक्षणिक साहित्य याच ठिकाणी ठेवले जाते.

प्राथमिकस्तर हा विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासाचा पाया आहे. काेराेना काळात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई भरून काढणे आवश्यक आहे. तसेच बाेलीभाषेतून प्रमाणभाषेकडे वाटचाल करण्यासाठी फुलाेरा उपक्रम राबविला. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. ही गडचिराेली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी