शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 10:32 IST

पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण प्रयत्न

गडचिराेली : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘फुलाेरा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.

जिल्ह्यातील ५० टक्के शाळा आदिवासीबहुल भागात आहेत. काही विद्यार्थ्यांची मातृभाषा गाेंडी, माडिया, छत्तीसगडी, तेलगू, बंगाली आहे. या विद्यार्थ्यांना मराठी समजत नाही. या विद्यार्थ्यांच्या बाेलीभाषेचा वापर करीत अध्यापन करणे व त्यांना प्रमाणित मराठी भाषा शिकविणे, गणितीय प्रक्रिया सहज साेपी करण्यासाठी अधिकाधिक शैक्षणिक साहित्याचा वापर करणे या उद्देशाने फुलाेरा उपक्रमाची सुरुवात २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात करण्यात आली. सुरुवातीला ३३६ शाळांमध्ये हा उपक्रम प्रायाेगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३४३ शाळांची निवड झाली. सद्यस्थितीत ६७९ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. जून २०२२ अखेरपर्यंत एक हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने जिल्ह्यातील काही निवडक शाळांना भेट देऊन गुुणवत्तेची तपासणी केली असता, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला असल्याचे दिसून आले. त्यानंतर या उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

वर्ग झाले बालभवनात रूपांतरित

अध्ययनासाठी शैक्षणिक साहित्य हा अतिशय महत्त्वाचा भाग असला तरी, हे साहित्य शाळेतील एखाद्या कपाटात ठेवले जाते. गरज पडेल तेव्हाच ते काढले जाते. फुलाेरा उपक्रमाअंतर्गत बालभवन निर्माण करण्यात आले आहे. वर्गखाेलीलाच बालभवन असे नाव दिले आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी तयार केलेले सर्व शैक्षणिक साहित्य याच ठिकाणी ठेवले जाते.

प्राथमिकस्तर हा विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासाचा पाया आहे. काेराेना काळात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई भरून काढणे आवश्यक आहे. तसेच बाेलीभाषेतून प्रमाणभाषेकडे वाटचाल करण्यासाठी फुलाेरा उपक्रम राबविला. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. ही गडचिराेली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी