शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 10:32 IST

पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण प्रयत्न

गडचिराेली : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘फुलाेरा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे.

जिल्ह्यातील ५० टक्के शाळा आदिवासीबहुल भागात आहेत. काही विद्यार्थ्यांची मातृभाषा गाेंडी, माडिया, छत्तीसगडी, तेलगू, बंगाली आहे. या विद्यार्थ्यांना मराठी समजत नाही. या विद्यार्थ्यांच्या बाेलीभाषेचा वापर करीत अध्यापन करणे व त्यांना प्रमाणित मराठी भाषा शिकविणे, गणितीय प्रक्रिया सहज साेपी करण्यासाठी अधिकाधिक शैक्षणिक साहित्याचा वापर करणे या उद्देशाने फुलाेरा उपक्रमाची सुरुवात २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात करण्यात आली. सुरुवातीला ३३६ शाळांमध्ये हा उपक्रम प्रायाेगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३४३ शाळांची निवड झाली. सद्यस्थितीत ६७९ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. जून २०२२ अखेरपर्यंत एक हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने जिल्ह्यातील काही निवडक शाळांना भेट देऊन गुुणवत्तेची तपासणी केली असता, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला असल्याचे दिसून आले. त्यानंतर या उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

वर्ग झाले बालभवनात रूपांतरित

अध्ययनासाठी शैक्षणिक साहित्य हा अतिशय महत्त्वाचा भाग असला तरी, हे साहित्य शाळेतील एखाद्या कपाटात ठेवले जाते. गरज पडेल तेव्हाच ते काढले जाते. फुलाेरा उपक्रमाअंतर्गत बालभवन निर्माण करण्यात आले आहे. वर्गखाेलीलाच बालभवन असे नाव दिले आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी तयार केलेले सर्व शैक्षणिक साहित्य याच ठिकाणी ठेवले जाते.

प्राथमिकस्तर हा विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासाचा पाया आहे. काेराेना काळात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. ही नुकसान भरपाई भरून काढणे आवश्यक आहे. तसेच बाेलीभाषेतून प्रमाणभाषेकडे वाटचाल करण्यासाठी फुलाेरा उपक्रम राबविला. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या उपक्रमाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. ही गडचिराेली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी