शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरवरून आले एकरावर, ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक

By दिगांबर जवादे | Updated: May 13, 2024 17:48 IST

लोकसंख्या वाढली अन् हिस्सेदारीही : जमिनीचे झाले अनेक तुकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीची हिस्सेदारी वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ४५ टक्के शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षा कमी व ३५ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन आहे. केवळ २५ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. ही बाब भविष्यात चिंता वाढवणारी आहे.

देशात औद्योगिक क्रांती झाली असली तरीही ग्रामीण भागातील ८० टक्के जनता शेतीशेतीवर आधारित व्यवसायांवरच जीवन जगत आहे. त्यामुळे शेतीचे महत्त्व अजूनही कमी झाले नाही. ५० पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आता दुसरा रोजगार शोधणे व करणे कठीण आहे. त्यामुळे शेतीत शंभर भानगडी असल्या तरी ते शेतीच करत असतात. शासनही शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात असलेले जमिनीचे क्षेत्र ही मुख्य अडचण निर्माण झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी कशी तरी जमीन कसून जीवन जगत असतात.

त्यामुळे स्वतः शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र खरेदी करणे त्यांना शक्य नसते. मात्र, शासनालाही त्याला लाखो रुपये किमतीचे तंत्रज्ञान व यंत्र अल्पभूधारक शेतकऱ्याला सबसिडीवर देणे परवडत नाही. परिणामी, पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जात आहे. त्यामुळे त्याची उत्पादकता कमी आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानासाठी खातेफोड करून जमिनीत हिस्सेदारी वाढविल्याचेही दिसून येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अशक्य● शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, शेतजमिनीच्या लहानशा तुकड्यात आधुनिक तंत्रज्ञान बसवणे कठीण होते. तसेच शेतीच्या उत्पन्नावर कसेतरी जीवन जगणारा शेतकरी लाखो रुपयांचे आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र बसवू शकत नाही.● आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सामूहिक शेती हा पर्याय आहे. त्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मोठ्या यंत्रांवर सबसिडी देताना बचत गट निर्माण करण्याचे आवाहन केले जात आहे. बचत गटालाच सबसिडी दिली जात आहे. मात्र, सामूहिक शेती करण्यास येथील शेतकरी तयार होत नाही.

जोडधंद्यांऐवजी मजुरीवरच भरशेती कमी प्रमाणात असली तरी शेतीशी संबंधित जोडधंदा केल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. मात्र, अल्पभूधारक शेतकरी जोडधंदा करण्याऐवजी मजुरी करण्यास पंसती दर्शवितात. मजुरीसाठी काही महिने दुसऱ्या राज्यात राहतात. त्या मजुरीतून काही महिन्यांच्या जगण्याची तजवीज होते.

जिल्ह्यातील शेतकरी संख्या जमिनीचे प्रमाण                            शेतकरी संख्याअत्यल्प (० ते १ हेक्टर) टक्के ४५%                                                 ५७,३४२अल्प (१ ते २ हेक्टर) टक्के ३०%                                                     ४१,४६६मोठे (२ हेक्टरपेक्षा अधिक) टक्के २५%                                          ३६,०२५एकूण शेतकरी                                                                              १,३४,८३३

दोन पिके घेण्याकडे वाढला कल• शासनाकडून विहीर खोदण्यासाठी सबसिडी दिली जात आहे. या विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा निर्माण होत आहे. त्यामुळे काही शेतकरी खरिपासह उन्हाळ्यातही पिके घेण्यास पसंती दर्शवत आहेत. मात्र, हे प्रमाण अतिशय कमी आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विहिरीच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती