शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

हेक्टरवरून आले एकरावर, ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक

By दिगांबर जवादे | Updated: May 13, 2024 17:48 IST

लोकसंख्या वाढली अन् हिस्सेदारीही : जमिनीचे झाले अनेक तुकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीची हिस्सेदारी वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ४५ टक्के शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षा कमी व ३५ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन आहे. केवळ २५ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. ही बाब भविष्यात चिंता वाढवणारी आहे.

देशात औद्योगिक क्रांती झाली असली तरीही ग्रामीण भागातील ८० टक्के जनता शेतीशेतीवर आधारित व्यवसायांवरच जीवन जगत आहे. त्यामुळे शेतीचे महत्त्व अजूनही कमी झाले नाही. ५० पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आता दुसरा रोजगार शोधणे व करणे कठीण आहे. त्यामुळे शेतीत शंभर भानगडी असल्या तरी ते शेतीच करत असतात. शासनही शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात असलेले जमिनीचे क्षेत्र ही मुख्य अडचण निर्माण झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी कशी तरी जमीन कसून जीवन जगत असतात.

त्यामुळे स्वतः शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र खरेदी करणे त्यांना शक्य नसते. मात्र, शासनालाही त्याला लाखो रुपये किमतीचे तंत्रज्ञान व यंत्र अल्पभूधारक शेतकऱ्याला सबसिडीवर देणे परवडत नाही. परिणामी, पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जात आहे. त्यामुळे त्याची उत्पादकता कमी आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानासाठी खातेफोड करून जमिनीत हिस्सेदारी वाढविल्याचेही दिसून येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अशक्य● शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, शेतजमिनीच्या लहानशा तुकड्यात आधुनिक तंत्रज्ञान बसवणे कठीण होते. तसेच शेतीच्या उत्पन्नावर कसेतरी जीवन जगणारा शेतकरी लाखो रुपयांचे आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र बसवू शकत नाही.● आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सामूहिक शेती हा पर्याय आहे. त्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मोठ्या यंत्रांवर सबसिडी देताना बचत गट निर्माण करण्याचे आवाहन केले जात आहे. बचत गटालाच सबसिडी दिली जात आहे. मात्र, सामूहिक शेती करण्यास येथील शेतकरी तयार होत नाही.

जोडधंद्यांऐवजी मजुरीवरच भरशेती कमी प्रमाणात असली तरी शेतीशी संबंधित जोडधंदा केल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. मात्र, अल्पभूधारक शेतकरी जोडधंदा करण्याऐवजी मजुरी करण्यास पंसती दर्शवितात. मजुरीसाठी काही महिने दुसऱ्या राज्यात राहतात. त्या मजुरीतून काही महिन्यांच्या जगण्याची तजवीज होते.

जिल्ह्यातील शेतकरी संख्या जमिनीचे प्रमाण                            शेतकरी संख्याअत्यल्प (० ते १ हेक्टर) टक्के ४५%                                                 ५७,३४२अल्प (१ ते २ हेक्टर) टक्के ३०%                                                     ४१,४६६मोठे (२ हेक्टरपेक्षा अधिक) टक्के २५%                                          ३६,०२५एकूण शेतकरी                                                                              १,३४,८३३

दोन पिके घेण्याकडे वाढला कल• शासनाकडून विहीर खोदण्यासाठी सबसिडी दिली जात आहे. या विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा निर्माण होत आहे. त्यामुळे काही शेतकरी खरिपासह उन्हाळ्यातही पिके घेण्यास पसंती दर्शवत आहेत. मात्र, हे प्रमाण अतिशय कमी आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विहिरीच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती