शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

हेक्टरवरून आले एकरावर, ७५ टक्के शेतकरी अल्पभूधारक

By दिगांबर जवादे | Updated: May 13, 2024 17:48 IST

लोकसंख्या वाढली अन् हिस्सेदारीही : जमिनीचे झाले अनेक तुकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीची हिस्सेदारी वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ४५ टक्के शेतकऱ्यांकडे एक हेक्टरपेक्षा कमी व ३५ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढीच जमीन आहे. केवळ २५ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. ही बाब भविष्यात चिंता वाढवणारी आहे.

देशात औद्योगिक क्रांती झाली असली तरीही ग्रामीण भागातील ८० टक्के जनता शेतीशेतीवर आधारित व्यवसायांवरच जीवन जगत आहे. त्यामुळे शेतीचे महत्त्व अजूनही कमी झाले नाही. ५० पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आता दुसरा रोजगार शोधणे व करणे कठीण आहे. त्यामुळे शेतीत शंभर भानगडी असल्या तरी ते शेतीच करत असतात. शासनही शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात असलेले जमिनीचे क्षेत्र ही मुख्य अडचण निर्माण झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी कशी तरी जमीन कसून जीवन जगत असतात.

त्यामुळे स्वतः शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र खरेदी करणे त्यांना शक्य नसते. मात्र, शासनालाही त्याला लाखो रुपये किमतीचे तंत्रज्ञान व यंत्र अल्पभूधारक शेतकऱ्याला सबसिडीवर देणे परवडत नाही. परिणामी, पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जात आहे. त्यामुळे त्याची उत्पादकता कमी आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानासाठी खातेफोड करून जमिनीत हिस्सेदारी वाढविल्याचेही दिसून येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अशक्य● शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, शेतजमिनीच्या लहानशा तुकड्यात आधुनिक तंत्रज्ञान बसवणे कठीण होते. तसेच शेतीच्या उत्पन्नावर कसेतरी जीवन जगणारा शेतकरी लाखो रुपयांचे आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र बसवू शकत नाही.● आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सामूहिक शेती हा पर्याय आहे. त्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मोठ्या यंत्रांवर सबसिडी देताना बचत गट निर्माण करण्याचे आवाहन केले जात आहे. बचत गटालाच सबसिडी दिली जात आहे. मात्र, सामूहिक शेती करण्यास येथील शेतकरी तयार होत नाही.

जोडधंद्यांऐवजी मजुरीवरच भरशेती कमी प्रमाणात असली तरी शेतीशी संबंधित जोडधंदा केल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. मात्र, अल्पभूधारक शेतकरी जोडधंदा करण्याऐवजी मजुरी करण्यास पंसती दर्शवितात. मजुरीसाठी काही महिने दुसऱ्या राज्यात राहतात. त्या मजुरीतून काही महिन्यांच्या जगण्याची तजवीज होते.

जिल्ह्यातील शेतकरी संख्या जमिनीचे प्रमाण                            शेतकरी संख्याअत्यल्प (० ते १ हेक्टर) टक्के ४५%                                                 ५७,३४२अल्प (१ ते २ हेक्टर) टक्के ३०%                                                     ४१,४६६मोठे (२ हेक्टरपेक्षा अधिक) टक्के २५%                                          ३६,०२५एकूण शेतकरी                                                                              १,३४,८३३

दोन पिके घेण्याकडे वाढला कल• शासनाकडून विहीर खोदण्यासाठी सबसिडी दिली जात आहे. या विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा निर्माण होत आहे. त्यामुळे काही शेतकरी खरिपासह उन्हाळ्यातही पिके घेण्यास पसंती दर्शवत आहेत. मात्र, हे प्रमाण अतिशय कमी आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विहिरीच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती