लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : ८५ टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्याची योजना असल्याचे भासवून शेतकऱ्यांकडून १५ टक्के रक्कम घेऊन पूर्व विदर्भातील शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष कोरेटी यांनी मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट घेऊन याप्रकरणी सखोल चौकशी करून ६०९ शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत व फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी डॉ. आशिष कोरेटी यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर माया इवनाते, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भाध्यक्ष दिनेश शेराम, विनोद मसराम, दिलीप मडावी, स्वप्नील मसराम, रोशन सावंतवान हजर होते.
लाभ देण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडूनही लूटविविध शासकीय योजनांचा लाभदेण्याच्या नावाखाली संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जाते. अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभ मिळणार नाही, अशी भीती दाखवून शेतकऱ्यांकडून पैसा वसूल केला जातो. याबाबत शेतकरी तक्रार करत नसल्याने त्यांच्या मनमानीला खतपाणी मिळते. जिल्ह्यात विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांची लूट करतात.