शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

साडेचार वर्षांत आमदारांचे मताधिक्य २0,३८४ ने घटले

By admin | Updated: May 27, 2014 23:40 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नवा चेहरा म्हणून गडचिरोलीचे उच्चविद्या विभुषीत आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी दिली होती.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नवा चेहरा म्हणून गडचिरोलीचे उच्चविद्या विभुषीत आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी दिली होती. ते लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. परंतु अवघ्या साडेचार वर्षात त्यांचे मताधिक्यही २0 हजार ३८४ मतांची घटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते विधानसभेच्या विजयाबाबत साशंक आहेत. पुन्हा निवडणूक डॉ. उसेंडी यांनी लढवू नये, असे म्हणणारेही अनेक कार्यकर्ते असले तरी परिस्थिती सुधारेल, असे सांगणारेही शेकडो नेते आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या द्विधा मनस्थितीत आहे.

२00९ मध्ये विधानसभेची निवडणूक सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून डॉ. नामदेवराव उसेंडी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून रिंगणात होते. त्यांनी या निवडणुकीत ६७ हजार ५४२ मते मिळवून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा ९६0 मतांची पराभव केला होता. नेते यांना ६६ हजार ५८२ मते मिळाली होती. साडेचार वर्षात महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असल्याने डॉ. उसेंडी यांच्या माध्यमातून अनेक कामे जिल्ह्यात झाली.

सुदैवाने पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांच्यासारखा वजनदार मंत्री जिल्ह्याला मिळाला. मोठे सिंचन प्रकल्पही मार्गी लावल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला. राहूल गांधींच्या मर्जीतील आमदार म्हणून डॉ. उसेंडी यांचा लौकीक सर्वदूर पसरला. या माध्यमातूनच मधुसूदन मिस्त्री यांनी वर्षभरापूर्वीच डॉ. उसेंडी यांच्या कामावर शिक्कामोर्तब करीत त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले होते, असा दावाही काँग्रेसचे काही अतिउत्साही पदाधिकारी निवडणुकी दरम्यान करीत होते. साडेचार वर्षात उसेंडी यांचे मताधिक्य मतदारांनी मात्र २0 हजार ३८४ ने खाली घसरविलेले आहे. शेअरबाजाराचा निर्देशांक ज्या प्रमाणे गडगडतो त्याच धर्तीवर उसेंडी यांचे मताधिक्यही २0१४ मध्ये २0 हजारावर खाली आले आहे. लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. उसेंडी यांना ४६ हजार १५८ मते मिळाली आहे. त्यामुळे डॉ. उसेंडी यांच्या लोकप्रियतेला कमालीची ओहटी लागली, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ग्रामीणस्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी संपर्क कमी होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय कठीण टप्प्यातील आहे. त्यामुळे उसेंडीविरोधक त्यांची उमेदवारी कापून नवा उमेदवार मागण्यासाठी कंबर कसणार आहे. एकूणच काँग्रेस पक्षo्रेष्ठीही याबाबत काय चिंतन करते, याकडे काँग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)