शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

६२०० कोटींच्या गुंतवणुकीची पायाभरणी ; गावांचे विस्थापन न करता होणार प्रकल्पांचा विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:41 IST

प्रशासनाकडून स्पष्टोक्ती : सुरजागड परिसरातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व आकांक्षित गडचिरोलीतील लोह उत्खनन व पोलाद निर्मिती प्रकल्पांचा विस्तार होऊ घातला आहे. यासंदर्भात पर्यावरण विभागाकडून जनसुनावणी घेतली जाणार आहे. या प्रकल्पांच्या विस्तारामुळे कोणत्याही गावाचे विस्थापन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती प्रशासनाने दिली, त्यामुळे सुरजागड प्रकल्पाच्या परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.

शासनाने लायड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड या कंपनीला सुरजागड (ता. एटापल्ली) येथील ३४८ हेक्टर वनजमीन २००७-२००८ मध्ये लोह खनिज उत्खननासाठी लीजवर दिली होती. या प्रकल्पाचा विस्तार होणार असून त्याची जनसुनावणी २८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. यासोबतच हेडरी, बांडे व परसलगोंदी येथील प्रकल्पांची जनसुनावणीही त्याच दिवशी पार पडणार आहे. त्यामुळे या परिसरात कोणत्याही गावाचे विस्थापन केले जाणार नसल्याची माहिती एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी व परीविक्षाधीन अधिकारी (आयएएस) नमन गोयल यांनी दिली. त्याआधी २३ जानेवारीला कोनसरी (ता. चामोर्शी) येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या विस्ताराबाबत पर्यावरण विषयावर जनसुनावणी होऊ घातली आहे. यातून परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. याचा आदिवासीबहुल गावांना फायदा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारल्याने अपेक्षा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला स्टील सिटी बनवू, अशी भिष्मप्रतिज्ञा केली आहे. सोबतच पालकत्व स्वतःकडे कायम ठेवले आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यातून आदिवासीबहुल भागात रोजगारनिर्मिती होऊन शिक्षण, आरोग्याचे प्रश्न दूर होऊन आर्थिक स्थैर्य येईल, अशी अपेक्षा आहे.

सामाजिक उपक्रमांतून बदलले जीवनमान 

  • लॉयड मेटल्सच्या लोह उत्खनन प्रकल्पांना सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होता. मात्र, कंपनीने सामाजिक दायित्व निभावत सामान्यांचे जीवनमान बदलले.
  • या भागात कंपनीतर्फे इंग्रजी माध्यमाची शाळा, अत्याधुनिक दवाखाना, युवकांना तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा प्रबोधिनीतून खेळाडूंना प्रोत्साहन तसेच गरीब, गरजूंना मदत असे विविध उपक्रम राबविले जातात. यातून स्थानिकांचा विरोध मोडीत निघाला आहे. सुरजागड परिसरातील बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळाल्याने त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले आहे.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी