शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

६२०० कोटींच्या गुंतवणुकीची पायाभरणी ; गावांचे विस्थापन न करता होणार प्रकल्पांचा विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:41 IST

प्रशासनाकडून स्पष्टोक्ती : सुरजागड परिसरातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व आकांक्षित गडचिरोलीतील लोह उत्खनन व पोलाद निर्मिती प्रकल्पांचा विस्तार होऊ घातला आहे. यासंदर्भात पर्यावरण विभागाकडून जनसुनावणी घेतली जाणार आहे. या प्रकल्पांच्या विस्तारामुळे कोणत्याही गावाचे विस्थापन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती प्रशासनाने दिली, त्यामुळे सुरजागड प्रकल्पाच्या परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.

शासनाने लायड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड या कंपनीला सुरजागड (ता. एटापल्ली) येथील ३४८ हेक्टर वनजमीन २००७-२००८ मध्ये लोह खनिज उत्खननासाठी लीजवर दिली होती. या प्रकल्पाचा विस्तार होणार असून त्याची जनसुनावणी २८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. यासोबतच हेडरी, बांडे व परसलगोंदी येथील प्रकल्पांची जनसुनावणीही त्याच दिवशी पार पडणार आहे. त्यामुळे या परिसरात कोणत्याही गावाचे विस्थापन केले जाणार नसल्याची माहिती एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी व परीविक्षाधीन अधिकारी (आयएएस) नमन गोयल यांनी दिली. त्याआधी २३ जानेवारीला कोनसरी (ता. चामोर्शी) येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या विस्ताराबाबत पर्यावरण विषयावर जनसुनावणी होऊ घातली आहे. यातून परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. याचा आदिवासीबहुल गावांना फायदा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारल्याने अपेक्षा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला स्टील सिटी बनवू, अशी भिष्मप्रतिज्ञा केली आहे. सोबतच पालकत्व स्वतःकडे कायम ठेवले आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यातून आदिवासीबहुल भागात रोजगारनिर्मिती होऊन शिक्षण, आरोग्याचे प्रश्न दूर होऊन आर्थिक स्थैर्य येईल, अशी अपेक्षा आहे.

सामाजिक उपक्रमांतून बदलले जीवनमान 

  • लॉयड मेटल्सच्या लोह उत्खनन प्रकल्पांना सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होता. मात्र, कंपनीने सामाजिक दायित्व निभावत सामान्यांचे जीवनमान बदलले.
  • या भागात कंपनीतर्फे इंग्रजी माध्यमाची शाळा, अत्याधुनिक दवाखाना, युवकांना तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा प्रबोधिनीतून खेळाडूंना प्रोत्साहन तसेच गरीब, गरजूंना मदत असे विविध उपक्रम राबविले जातात. यातून स्थानिकांचा विरोध मोडीत निघाला आहे. सुरजागड परिसरातील बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळाल्याने त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले आहे.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी