शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

जंगलातील तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

वनविभागाने या वनतलावाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कारण उन्हाळ्यात सदर तलावातील पाण्यावर वन्यजीवाची तहाण भागत असते. आंतरभागात हा तलाव खोल असल्याने व पाणी साठवणूक क्षमता अधिक असल्याने वैरागड, रामाळा, पळसगाव, सालमारा व परिसरातील लोक या तलावाचे नामकरण पाण्याची टाकी, असे केले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची सोय : पाळीवरून पाणी जात असल्याने फुटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैरागड-आरमोरी रोडलगतच्या वैरागडपासून चार किमी अंतरावर जंगलात तलाव आहे. या तलावाला पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाते. जोरदार पावसामुळे हा तलाव पूर्ण भरला असून पाळीवरून पाणी जात असल्याने हा तलाव फुटण्याची शक्यता आहे.वनविभागाने या वनतलावाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कारण उन्हाळ्यात सदर तलावातील पाण्यावर वन्यजीवाची तहाण भागत असते. आंतरभागात हा तलाव खोल असल्याने व पाणी साठवणूक क्षमता अधिक असल्याने वैरागड, रामाळा, पळसगाव, सालमारा व परिसरातील लोक या तलावाचे नामकरण पाण्याची टाकी, असे केले आहे. या तलावाच्या नामकरणाबाबत अनेक जाणकार सांगतात. यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने जंगलातील हा तलाव तुडूंब भरला आहे. तलावाच्या दर्शनी भागातून पाळीवरून पाणी जात असल्याने तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या तलावाच्या पाळीची थोडीफार डागडुजी केल्यास हा धोका टळू शकतो. उन्हाळ्यात या पाण्याचे संकट निर्माण होते. तेव्हा सालमारा, रामाळा, वैरागड व वासाळा जंगल परिसरातील वन्यजीव याच तलावावर येऊन तहाण भागवित असतात. उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुविधा केल्या जातात. नैसर्गिकरित्या पाण्याची झालेली साठवण सांभाळून ठेवण्यासाठी वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. यंदा जिल्हाभरातील वनतलावामध्ये भरपूर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत टिकण्यासाठी प्रयत्न व्हावे.

टॅग्स :Rainपाऊस