शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या अडेलतट्टू धोरणाने पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

वनहक्क कायदा व पेसाअंतर्गत आदिवासी बांधवांना तसेच ग्रामसभांना वनोपज संकलित करून त्याची विक्री करण्याच्या कामास आलापल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयाकडून मनाई केली जात आहे. वनोपजाबाबत या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात उपवनसंरक्षकाकडून उदासीनता दिसून येत आहे, असे गरंजी ग्रामसभेने म्हटले आहे.

ठळक मुद्देबांबू कटाई थंडबस्त्यात । वनोपज संकलित व विक्री करण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली/अहेरी : दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने कल्याणकारी तरतूद केली आहे. त्याअनुषंगाने वनहक्क व पेसा कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार गौण वनोपज संकलीत करून विक्रीचा अधिकार ग्रामसभांना प्रदान करण्यात आला आहे. मात्र वन विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे ग्रामसभांच्या या हक्कावर गदा येत असल्याने ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत.वनहक्क कायदा व पेसाअंतर्गत आदिवासी बांधवांना तसेच ग्रामसभांना वनोपज संकलित करून त्याची विक्री करण्याच्या कामास आलापल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयाकडून मनाई केली जात आहे. वनोपजाबाबत या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात उपवनसंरक्षकाकडून उदासीनता दिसून येत आहे, असे गरंजी ग्रामसभेने म्हटले आहे. वनहक्क कायद्यानुसार गरंजी ग्रामसभेने सुक्ष्म आराखडा सादर करून तो कार्यान्वित करण्याबाबत नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य वनसंरक्षक गडचिरोली व उपवनसंरक्षक आलापल्ली यांना कळविले. आलापल्लीच्या उपवनसंरक्षकांनी ग्रामसभेला वनोपज वाहतुकीचा परवाना मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पेसा व वनहक्क क्षेत्रातील शेकडो आदिवासी बांधव पारंपारिक व्यवसायापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे.आलापल्ली वन विभागातील मुखडी टोला, तलवाडा, मिरकल, गुरजा, कासमपल्ली आदी आदिवासी बहुल गावांना पेसा कायद्यानुसार वनोपज गोळा करून त्याची विक्री करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.या गावांनी यापूर्वी बांबू व इतर वनोपज संकलीत करून त्याची विक्री केली आहे. यावर्षीही वनहक्कानुसार बांबू कटाई करून ग्रामस्थांना रोजगार देण्याचे नियोजन ग्रामसभांचे होते. मात्र वन विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे तलवाडा ग्रामसभेचे अध्यक्ष मंगू पोटाडी यांनी म्हटले आहे.आलापल्ली वन विभागातील अगरबत्ती प्रकल्पांना बांबूचा पुरवठा करावयाचा असल्याने वन विभागाने ग्रामसभेबाबत अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे.सध्या मी बाहेरगावी आहे. सदर प्रकरणाबाबत आपल्याला सविस्तर माहिती कार्यालयात आल्यावर देण्यात येईल.- चंद्रकांत तांबे, उपवनसंरक्षकवन विभाग आलापल्ली

टॅग्स :forest departmentवनविभाग