शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

अनियमित पाऊस होण्याचा अंदाज

By admin | Updated: May 27, 2014 00:51 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे

वैरागड : यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे पासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. साहजीकच शेतकरी वर्गाचे पाऊले आता पंचांगकर्त्यांकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून वर्षभराच्या पावसाचा अंदाज घेतला जात आहे. मानापूर येथील रामभाऊ हस्तक व गणेश वझे या पंचांगकर्त्यांनी सांगितले की, रोहणी नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्र काळात आकाश अभ्राच्छादीत राहील. उकाळ्यात वाढ होईल, मात्र पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. मृगनक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने या नक्षत्रात ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकून वादळ, वार्‍यासह पावसाला ८ जूनच्या दरम्यान सुरूवात होणार आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. आद्रा नक्षत्र चांगल्या पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल. भात पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज राहते. एवढ्या पावसासाठी शेतकर्‍याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पूनर्वसु हा नक्षत्र पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. या नक्षत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर येऊन जीवित व आर्थिक हानी होईल. धानपट्ट्यात धान लागवडीला सुरूवात होईल. १५ आॅगस्टपर्यंत पर्जन्यवृष्टी कायम राहील. मघा, पूर्वा या नक्षत्रामध्ये अनियमित पाऊस राहणार आहे. अंतिम चरणातील हस्त, चित्रा व स्वाती या नक्षत्रांच्या काळातही पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. मृग नक्षत्रात ८ ते २० जूनपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. पूनर्वसु, पुष्प या नक्षत्र काळात अनियमित पाऊस पडेल. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पंचांगकर्ते व वेधशाळेने वर्तविलेले अंदाज खोटे ठरवित प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली होती. प्रारंभीचा रोहणी नक्षत्र वगळता सर्वच नक्षत्रांमध्ये शेवटपर्यंत पाऊस पडला होता. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यातच विदर्भातील सर्व तलाव, बोळ््या पाण्याने भरल्या होत्या. सततच्या पूर व पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक हानी झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. या पिकासाठी अगदी सुरूवातीपासून तर धान पीक निघेपर्यंत मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज राहते. त्यामुळे जेवढा पाऊस अधिक तेवढे धान पिकाचे उत्पादन चांगले असा अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जातो. मात्र पुरामुळे धान पीक कुजून उत्पादनात घट होते. जास्त पावसामुळे मात्र सोयाबिन, तूर, कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता राहते. (वार्ताहर)