शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

अनियमित पाऊस होण्याचा अंदाज

By admin | Updated: May 27, 2014 00:51 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे

वैरागड : यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे पासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. साहजीकच शेतकरी वर्गाचे पाऊले आता पंचांगकर्त्यांकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून वर्षभराच्या पावसाचा अंदाज घेतला जात आहे. मानापूर येथील रामभाऊ हस्तक व गणेश वझे या पंचांगकर्त्यांनी सांगितले की, रोहणी नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्र काळात आकाश अभ्राच्छादीत राहील. उकाळ्यात वाढ होईल, मात्र पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. मृगनक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने या नक्षत्रात ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकून वादळ, वार्‍यासह पावसाला ८ जूनच्या दरम्यान सुरूवात होणार आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. आद्रा नक्षत्र चांगल्या पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल. भात पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज राहते. एवढ्या पावसासाठी शेतकर्‍याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पूनर्वसु हा नक्षत्र पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. या नक्षत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर येऊन जीवित व आर्थिक हानी होईल. धानपट्ट्यात धान लागवडीला सुरूवात होईल. १५ आॅगस्टपर्यंत पर्जन्यवृष्टी कायम राहील. मघा, पूर्वा या नक्षत्रामध्ये अनियमित पाऊस राहणार आहे. अंतिम चरणातील हस्त, चित्रा व स्वाती या नक्षत्रांच्या काळातही पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. मृग नक्षत्रात ८ ते २० जूनपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. पूनर्वसु, पुष्प या नक्षत्र काळात अनियमित पाऊस पडेल. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पंचांगकर्ते व वेधशाळेने वर्तविलेले अंदाज खोटे ठरवित प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली होती. प्रारंभीचा रोहणी नक्षत्र वगळता सर्वच नक्षत्रांमध्ये शेवटपर्यंत पाऊस पडला होता. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यातच विदर्भातील सर्व तलाव, बोळ््या पाण्याने भरल्या होत्या. सततच्या पूर व पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक हानी झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. या पिकासाठी अगदी सुरूवातीपासून तर धान पीक निघेपर्यंत मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज राहते. त्यामुळे जेवढा पाऊस अधिक तेवढे धान पिकाचे उत्पादन चांगले असा अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जातो. मात्र पुरामुळे धान पीक कुजून उत्पादनात घट होते. जास्त पावसामुळे मात्र सोयाबिन, तूर, कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता राहते. (वार्ताहर)