शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

पुरामुळे शंभरावर गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:20 PM

पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपर्लकोटा, बांडीया नदी पुलावर पाणी : इंद्रावती, पामुलगौतम या नद्यांच्या जलस्तरात झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/भामरागड : पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्या छत्तीसड राज्यातून वाहतात. शनिवारी छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. पर्लकोटा ही नदी भामरागड शहराच्या अगदी जवळून वाहते. तिन्ही नद्यांचे भामरागडजवळ संगम सुध्दा आहे. तिन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पर्लकोटा नदी पर्लकोटा नदीला दाब निर्माण झाली. त्यामुळे पर्लकोटा नदीचे पाणी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पूलावर चढले. अचानक पाणी वाढल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली. सामान इतरत्र हलविण्याची धडपड रात्रभर सुरू होती. १२ वाजता भामरागड चौकातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर कंबरभर पाणी जमा झाले होते. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास नदीचे पाणी कमी होण्यास सुरूवात होऊन सकाळी ७ वाजता पूल मोकळा झाला. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी १० वाजता पाणी वाढण्यास सुरूवात झाली. दुपारी १२ वाजतानंतर भामरागडातील चौकात पाणी जमा होऊ लागले. सायंकाळपर्यंत पूर्ण चौक पुराच्या पाण्याने व्यापला होता. सायंकाळी उशीरापर्यंत पाण्याची पातळी वाढतच होती. त्यामुळे भामरागड शहरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली होती. पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्यातील ८० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागड-आरेवाडा नाल्यावर पाणी असल्याने या परिसरातील १० गावांचा भामरागड तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर भामरागड-कोठी, हेमलकसा-आलापल्ली मार्गावरील बांडीया नाल्यावरील पुलावर पाणी जमा झाले होते. पूर परिस्थिती असताना पूल ओलांडू नये, तसेच कोणीही सेल्फी काढू नये, यासाठी एसडीपीओ तानाजी बरडे, ठाणेदार सुरेश मदने यांच्या नियंत्रणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच तहसीलदार कैलास अंडील यांनी सुध्दा परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.जिमलगट्टा : जिमलगट्टा नाला भरून वाहत असल्याने देचलीपेठा परिसरातील जवळपास १० गावांचा संपर्क तुटला आहे. पेरमिली : आलापल्ली-भामरागड मार्गावरील पेरमिलीजवळच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे धान शेतीचेही पुराचे पाणी शेतीत शिरल्याने धान पिकाचेही नुकसान झाले. झिंगानूर : झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पाच ते सहा फूट पाणी जमा झाले आहे. या नाल्यावर पूल नाही. पावसाळ्यात एक पाऊस झाल्यानंतर सदर मार्ग बंद होतो. आसरअल्ली, अंकिसा, सोमनपल्ली, सिरोंचा, सोमनूर, गुमालकोंडा, मुत्तापूर गावांकडे जाणारे मार्ग बंद झाले.सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील बामणी व टेकडाताला नाल्यावर पाणी असल्याने या भागाचाही संपर्क तुटला होता.