शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

पूरग्रस्तांना लवकरच मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : नागरिकांनी वस्तू स्वरूपात मदत पाठविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे करून नुकसानाचा अंदाज येताच शासकीय मदतीचेही वाटप केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी शक्यतो त्यांना आवश्यकता असलेल्या वस्तूंच्या स्वरूपात मदत पाठवावी किंवा आर्थिक मदत द्यायची असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधीतच द्यावी, असे आवाहन केले.अनेक वर्षानंतर भामरागड तालुक्यात यावर्षी जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होऊन पशुहाणीही झाली. अनेकांच्या शेतीचेही नुकसान झाले. या सर्व नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी भामरागड तालुक्यातील महसूल कर्मचाºयांच्या दिमतीला बाहेरील तालुक्यातील तलाठ्यांना पाठविण्यात आले आहे. परंतू पंचनामे करण्यासाठी गावोगावी पोहोचण्यातही नाल्यांच्या अडचणी येत आहे. तसेच आरोग्य विभागाचीही जिल्हास्तरीय चमू सर्व गावांमध्ये जाऊन तपासणी करीत आहे. जलजन्य आणि कीटकजन्य आजारांपासून वाचण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सध्या उकळूनच पाणी प्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी १० अभियंत्यांना तर पशुंचे नुकसान पाहण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.दरम्यान अनेक सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयांसह दानशूर व्यक्तिंकडून भामरागडवासियांसाठी वस्तूरूपात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाने गुंडुरवाही, कोटपर्सी गावात जाऊन पूरग्रस्तांना दैनंदिन वस्तूंची मदत केली. दुर्गम भाग असल्याने त्या गावांना जाण्यासाठी चांगले रस्ते नाही. तेथील ४ घरे उद्धस्त झाली आहेत. तहसीलदार कैलास अंडील प्रत्येक नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी धावपळ करीत आहे.निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्जविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदारांमध्ये आणखी २०३० मतदारांची भर पडली आहे, तर ९२६ मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ३१ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसार जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमिळून ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सिंह व उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी दिली. यावेळी ना.तहसीलदार विवेक चडगुलवार हेसुद्धा उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर