शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

पूरग्रस्तांना लवकरच मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : नागरिकांनी वस्तू स्वरूपात मदत पाठविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे करून नुकसानाचा अंदाज येताच शासकीय मदतीचेही वाटप केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी शक्यतो त्यांना आवश्यकता असलेल्या वस्तूंच्या स्वरूपात मदत पाठवावी किंवा आर्थिक मदत द्यायची असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधीतच द्यावी, असे आवाहन केले.अनेक वर्षानंतर भामरागड तालुक्यात यावर्षी जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होऊन पशुहाणीही झाली. अनेकांच्या शेतीचेही नुकसान झाले. या सर्व नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी भामरागड तालुक्यातील महसूल कर्मचाºयांच्या दिमतीला बाहेरील तालुक्यातील तलाठ्यांना पाठविण्यात आले आहे. परंतू पंचनामे करण्यासाठी गावोगावी पोहोचण्यातही नाल्यांच्या अडचणी येत आहे. तसेच आरोग्य विभागाचीही जिल्हास्तरीय चमू सर्व गावांमध्ये जाऊन तपासणी करीत आहे. जलजन्य आणि कीटकजन्य आजारांपासून वाचण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सध्या उकळूनच पाणी प्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी १० अभियंत्यांना तर पशुंचे नुकसान पाहण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.दरम्यान अनेक सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयांसह दानशूर व्यक्तिंकडून भामरागडवासियांसाठी वस्तूरूपात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाने गुंडुरवाही, कोटपर्सी गावात जाऊन पूरग्रस्तांना दैनंदिन वस्तूंची मदत केली. दुर्गम भाग असल्याने त्या गावांना जाण्यासाठी चांगले रस्ते नाही. तेथील ४ घरे उद्धस्त झाली आहेत. तहसीलदार कैलास अंडील प्रत्येक नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी धावपळ करीत आहे.निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्जविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदारांमध्ये आणखी २०३० मतदारांची भर पडली आहे, तर ९२६ मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ३१ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसार जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमिळून ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सिंह व उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी दिली. यावेळी ना.तहसीलदार विवेक चडगुलवार हेसुद्धा उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर