शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत एकदाही भरडाई मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाचे उपअभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या आविका संस्था शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान संस्थेच्या आवारात उघड्यावर ठेवतात. शासन परिपत्रकानुसार त्या धानाची उचल दोन महिन्यात करून तो भरडाईसाठी पाठवणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात भरडाईला वेळ लागत असल्यामुळे दोन महिन्यात सर्व धानाची भरडाई करणे आदिवासी विकास महामंडळाला अशक्य होत आहे.

ठळक मुद्देअविकास संस्थांचे नुकसान : विलंबामुळे वाढताहे तूट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांकडील धान शासनाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी केल्यानंतर त्याची भरडाई (मिलिंग) दोन महिन्यात करणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्ष गेल्या पाच वर्षात एकाही वर्षी या नियमाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आदिवासी विकास महामंडळाला दरवर्षी धान भरडाईसाठी एक ते दिड वर्षाचा कालावधी लागला आहे. त्यामुळे तूट वाढून त्याचा भुर्दंड आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना सहन करावा लागत आहे.आदिवासी विकास महामंडळाचे उपअभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या आविका संस्था शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान संस्थेच्या आवारात उघड्यावर ठेवतात. शासन परिपत्रकानुसार त्या धानाची उचल दोन महिन्यात करून तो भरडाईसाठी पाठवणे गरजेचे असते. मात्र प्रत्यक्षात भरडाईला वेळ लागत असल्यामुळे दोन महिन्यात सर्व धानाची भरडाई करणे आदिवासी विकास महामंडळाला अशक्य होत आहे. मग एक ते दिड वर्ष पडून राहिलेल्या धानाच्या भरडाईतील तूट वाढणे नैसर्गिक असताना शासनाने यावर्षी केवळ १ टक्क्याची तूट मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा जास्त तूट आल्यास संबंधित आविका संस्थांच्या कमिशनमधून दिड टक्के भुर्दंड वसूल केला जाणार आहे. यामुळे यावर्षी धान खरेदी केंद्र घेण्यासाठी अनेक संस्थांनी उत्सुकता दाखविलेली नाही. ही स्थिती कायम राहिल्यास शेतकºयांना नाईलाजाने कमी भावात व्यापाऱ्यांना धान विकून नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.भरडाईसाठी तांदूळ देताना तो बँक गॅरंटीच्या प्रमाणात किंवा अग्रिम लॉटच्या प्रमाणात राईस मिलर्सला देण्याचे बंधन आहे. ज्या प्रमाणात तांदूळ जमा होईल त्याच प्रमाणात धानाची खरेदी केंद्रांवरून उचल देण्यात येते. त्यामुळे धान बऱ्याच कालावधीपर्यंत केंद्रावर पडून राहतो. गेल्या पाच वर्षातील भरडाईचा कालावधी पाहिल्यास २०१४-१५ मध्ये भरडाईसाठी १५ महिने लागले. त्यामुळे वजनात १.७५ टक्के घट आली. २०१५-१६ मध्ये १२ महिने कालावधी लागला. त्यावेळी २.३० टक्के घट आली. २०१६-१७ मध्ये १४ महिने लागल्यामुळे २.२४ टक्के घट, २०१७-१८ मध्ये १५ महिने लागल्यामुळे २.९० टक्के तर २०१८-१९ मध्ये भरडाईसाठी १३ महिने लागल्यामुळे १.२१ टक्के घट आली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली