शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पावणे पाच वर्ष उलटूनही बायपास रस्त्याचे भिजत घाेंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. मात्र ...

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. मात्र पावणे पाच वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरातील बायपास रस्त्याच्या बांधकामाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. सध्या येथील बायपास रस्ता जड वाहतुकदारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.

सिरोंचा-आष्टी-चामोर्शी- गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज- साकोली या राज्य मार्ग ३५३ सी चे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदाही काढण्यात आली होती. नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गासाठी १६२.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन सदर काम तीन महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक हाेते. मात्र, अद्यापही काम संथ गतीनेच सुरू असल्याने हा मार्ग शहराच्या जुन्याच मार्गाने जाणार की बायपासने, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रुंदीचा राहणार, याबाबतही संभ्रम कायम असून दरम्यान ४० मीटर रुंदीचा राहणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत. तथापि भूमिगत पुलाच्या अप्रोच मार्गांवरुन केवळ दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी वाहनेच आवागमन करू शकत असल्याने व रेल्वे पुलाची उंची फक्त ३.६० मीटर असल्याने मालवाहतूक वाहने बायपास मार्गाने वळविल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, सध्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने जड वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत.

बाॅक्स...

रेल्वे फाटकामुळे बायपासची गरज

विशेष म्हणजे, रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वेळोवेळी रेल्वे फाटक बंद करण्यात येते. अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होताेे. त्यामुळे बराच वेळ जड वाहने उभी ठेवावी लागतात. त्यातही तीन किलोमीटर अधिकचा फेरा मारुन वाहतूक करावी लागतेे. हा मार्ग अद्यापही दुर्लक्षित असल्याने बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. लाेकसंख्या व वाढती रहदारी लक्षात घेता येथे फ्लाॅयओव्हर ब्रिज निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच जड वाहतुकीच्या सोयीसाठी तातडीने या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.