शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

पावणे पाच वर्ष उलटूनही बायपास रस्त्याचे भिजत घाेंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. मात्र ...

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. मात्र पावणे पाच वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरातील बायपास रस्त्याच्या बांधकामाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. सध्या येथील बायपास रस्ता जड वाहतुकदारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.

सिरोंचा-आष्टी-चामोर्शी- गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज- साकोली या राज्य मार्ग ३५३ सी चे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदाही काढण्यात आली होती. नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गासाठी १६२.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन सदर काम तीन महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक हाेते. मात्र, अद्यापही काम संथ गतीनेच सुरू असल्याने हा मार्ग शहराच्या जुन्याच मार्गाने जाणार की बायपासने, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रुंदीचा राहणार, याबाबतही संभ्रम कायम असून दरम्यान ४० मीटर रुंदीचा राहणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत. तथापि भूमिगत पुलाच्या अप्रोच मार्गांवरुन केवळ दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी वाहनेच आवागमन करू शकत असल्याने व रेल्वे पुलाची उंची फक्त ३.६० मीटर असल्याने मालवाहतूक वाहने बायपास मार्गाने वळविल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, सध्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने जड वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत.

बाॅक्स...

रेल्वे फाटकामुळे बायपासची गरज

विशेष म्हणजे, रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वेळोवेळी रेल्वे फाटक बंद करण्यात येते. अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होताेे. त्यामुळे बराच वेळ जड वाहने उभी ठेवावी लागतात. त्यातही तीन किलोमीटर अधिकचा फेरा मारुन वाहतूक करावी लागतेे. हा मार्ग अद्यापही दुर्लक्षित असल्याने बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. लाेकसंख्या व वाढती रहदारी लक्षात घेता येथे फ्लाॅयओव्हर ब्रिज निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच जड वाहतुकीच्या सोयीसाठी तातडीने या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.