शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

गडचिरोली जिल्ह्यात पाच आदिवासी शेतकऱ्यांची टॉवरवर चढून विरुगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:56 IST

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी माईन्स वसाहतीच्या टॉवरवर चढून विरुगिरी करीत आंदोलन सुरु केले.

ठळक मुद्देमाणिकगड सिमेंट कंपनीच्या माईन्स वसाहतीच्या टॉवरवर

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचांदूर येथून १२ किमी अंतरावर कुसुंबी गाव आहे. या गावातील आदिवासी कोलाम समाज शेती करुन पोट भरत होते. परंतु माणिकगड सिमेंट कंपनीने त्यांची शेतजमीन व गाव उठवून तिथे माईन्स सुरु केली. कंपनीने या गरीब आदिवासींना नोकरी तर दिलीच नाही. परंतु कुसुंबी-लिंगनडोह रस्त्यावर कब्जा करुन या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या व्यक्तींनाही आता अडविले जात आहे. याविरोधात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनीच्याच माईन्सच्या टॉवरवर चढून सोमवारी विरुगिरी केली.याविरोधात यापूवीर्ही आंदोलने झाली. निवेदनही देण्यात आले. परंतु याकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने अखेर संतप्त होऊन पाच जणांनी टॉवरवर चढून सोमवारी सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे.कुसुंबी हे गाव प्रत्यक्षात व नकाशावर होते. जवळपास येथे २५ आदिवासी शेती करुन गुजरान करीत असताना माणिकगड सिमेंट कंपनीने त्यांची जमीन माईन्सकरिता घेण्यात आली. परंतु कंपनीने या गावातील जनतेचे पुनर्वसन केले नाही. मोबदला दिला नाही. कुटुंबातील एकाही सदस्याला नोकरी दिली नाही, असा आरोप कुसुंबीवासीयांकडून करण्यात आला. याकरिता अनेक आंदोलने झाली. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. अशातच कुसुंबी- लिंगनडोह रस्ता शासनाचा असताना कंपनीने कब्जा करुन या रस्त्यावर कंपनीने गेट लावले. ये जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबतही प्रशासनाला अनेक निवेदन देऊन आंदोलने केली. मात्र रस्त्यावरील कंपनीचे गेट काढण्यात आले नाही. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, या मागणीसाठी कुसुंबी येथील रामदास मंगाम (४०), जयराम कुळमेथे (३२), महादेव कुळमेथे (४०), सागर येडमे (३०), गणेश सिडाम ( ३०) अशा पाच आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारी माईन्स वसाहतीच्या टॉवरवर चढून विरुगिरी करीत आंदोलन सुरु केले.

तीनही तहसीलदार घटनास्थळीकोसंबी गाव जिवती तालुक्यात आहे. आंदोलनस्थळ म्हणजे टॉवर राजुरा तालुक्यात तर पोलीस स्टेशन कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन येत असल्याने घटनेची माहिती मिळताच राजुरा, जिवती, कोरपना तालुक्याचे तहसीलदार, तलाठी व गडचांदूर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिपर्यंत ते आंदोलनकर्त्यांशी बोलत होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन