शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाेध घेता यावा यासाठी पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातात.  परीक्षा शुल्क कमी राहते. शाळेचे मुख्याध्यापकच परीक्षेचा अर्ज भरून देतात. तसेच गावाजवळच्या शाळेतच परीक्षा केंद्र राहते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात.

ठळक मुद्दे१० एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. यापूर्वी ही परीक्षा २५ एप्रिल राेजी घेण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. मात्र राज्यभरात वाढत असलेले काेराेनाचे रूग्ण लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता २३ मे राेजी घेतली जाणार आहे.प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाेध घेता यावा यासाठी पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातात.  परीक्षा शुल्क कमी राहते. शाळेचे मुख्याध्यापकच परीक्षेचा अर्ज भरून देतात. तसेच गावाजवळच्या शाळेतच परीक्षा केंद्र राहते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात. जिल्हाभरातील जवळपास पाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. ही परीक्षा २५ एप्रिल राेजी निश्चित करण्यात आली हाेती. मात्र काेराेनाचे रूग्ण वाढत असल्याने आताच परीक्षा घेणे धाेक्याचे ठरू शकते ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा २३ मे राेजी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुन्हा काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे. १० एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. 

अभ्यास करण्यास मिळाला महिनामहिनाभराने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करण्यासाठी महिनाभराचा कालावधी मिळाला आहे. शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी केवळ शिष्यव्त्तीचा अभ्यास करतील.

काेराेनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा

सध्या राज्यात काेराेनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. काेराेनाची लाट आता काही दिवस पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ मे राेजी परीक्षा हाेणार आहे. ताेपर्यंत काेराेनाची काय स्थिती राहते. त्यावरून पुन्हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी परीक्षा देतात. वयाने हे विद्यार्थी लहान आहेत. परीक्षा केंद्रांवर गर्दी हाेणार नाही. याची खबरदारी घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.  परीक्षा पास हाेण्यासाठी प्रत्येक विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.मात्र केवळ परीक्षा पास झाला तर शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यासाठी प्राविण्यप्राप्त गुण मिळवावे लागतात. प्राविण्यप्राप्त  विद्यार्थ्याला दरमहा जवळपास १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती