शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाेध घेता यावा यासाठी पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातात.  परीक्षा शुल्क कमी राहते. शाळेचे मुख्याध्यापकच परीक्षेचा अर्ज भरून देतात. तसेच गावाजवळच्या शाळेतच परीक्षा केंद्र राहते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात.

ठळक मुद्दे१० एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. यापूर्वी ही परीक्षा २५ एप्रिल राेजी घेण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. मात्र राज्यभरात वाढत असलेले काेराेनाचे रूग्ण लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता २३ मे राेजी घेतली जाणार आहे.प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाेध घेता यावा यासाठी पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातात.  परीक्षा शुल्क कमी राहते. शाळेचे मुख्याध्यापकच परीक्षेचा अर्ज भरून देतात. तसेच गावाजवळच्या शाळेतच परीक्षा केंद्र राहते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात. जिल्हाभरातील जवळपास पाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. ही परीक्षा २५ एप्रिल राेजी निश्चित करण्यात आली हाेती. मात्र काेराेनाचे रूग्ण वाढत असल्याने आताच परीक्षा घेणे धाेक्याचे ठरू शकते ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा २३ मे राेजी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुन्हा काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे. १० एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. 

अभ्यास करण्यास मिळाला महिनामहिनाभराने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करण्यासाठी महिनाभराचा कालावधी मिळाला आहे. शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी केवळ शिष्यव्त्तीचा अभ्यास करतील.

काेराेनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा

सध्या राज्यात काेराेनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. काेराेनाची लाट आता काही दिवस पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ मे राेजी परीक्षा हाेणार आहे. ताेपर्यंत काेराेनाची काय स्थिती राहते. त्यावरून पुन्हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी परीक्षा देतात. वयाने हे विद्यार्थी लहान आहेत. परीक्षा केंद्रांवर गर्दी हाेणार नाही. याची खबरदारी घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.  परीक्षा पास हाेण्यासाठी प्रत्येक विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.मात्र केवळ परीक्षा पास झाला तर शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यासाठी प्राविण्यप्राप्त गुण मिळवावे लागतात. प्राविण्यप्राप्त  विद्यार्थ्याला दरमहा जवळपास १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती