शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

२४ तास विजेसाठी पाच हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह निघाला माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 14:47 IST

कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी देसाईगंजातून माेर्चा काढला.

ठळक मुद्देदाेन ठिकाणी अडविले : पायदळ निघाल्यानंतर पाेलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी २४ जानेवारी राेजी देसाईगंजातून माेर्चा काढला. तरीही या माेर्च्याला कुरूड व काेंढाळा येथे पाेलिसांनी अडविले. शेवटी माेर्चेकरू पायदळ आरमाेरीच्या दिशेने निघाले; परंतु पाेलिसांनी प्रमुख लाेकांना ताब्यात घेत माेर्चा माेडून काढला.

कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा मिळावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख (आरमाेरी विधानसभा क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनाने शेतकरी देसाईगंज येथे एकवटले. त्यानंतर माेर्चेकरू गडचिरोलीच्या महावितरण कार्यालयाकडे निघाले. असता कुरूड फाट्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावून मोर्चा अडविला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कुरूड फाट्यावर दोन तास चक्काजाम केला व पायदळ निघाले. याचवेळी महावितरण कंपनीचे देसाईगंज येथील कार्यकारी अभियंता डोंगरवार यांच्यासह कुरखेडाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे व देसाईगंजचे अभियंता सारवे आदींनी कोंढाळा ते आरमोरीच्यामध्ये माेर्चा थांबवून दोन तास चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. शेवटी पाेलीसबळाने माेर्चा माेडीत काढला. मोर्चात उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, सागर मने, भूषण सातव, शैलेश चितमलवार, नगरसेवक अशोक कंगाली, अनिल मिसार, अरुण राऊत, चिंटू नाकाडे, तानाजी ठाकरे तसेच कार्यकर्ते व शेतकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

काेंढाळ्यात तीन तास राेखला रस्ता

वेळाेवेळी पाेलिसांनी अडविल्यानंतर कोढाळा येथेसुद्धा शेतकऱ्यांनी तीन तास चक्काजाम आंदाेलन केले. यावेळी शेतकरी खूप आक्रमक झाल्याने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. आंदाेलनकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम, नंदू चावला,विकास प्रधान, विजय पुस्ताेडे यांच्यासह काही शेतकऱ्यांना पाेलिसांनी अटक केली.

पालकमंत्र्यांचे आश्वासन

२४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली. काही दिवसातच कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. दरम्यान शेतकऱ्यांचा मोर्चा गडचिरोली येथे पाेहोचू नये, याकरिता आरमोरी, पाेर्ला तसेच खरपुंडी फाट्यावर चाेख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीजagitationआंदोलन