शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास विजेसाठी पाच हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह निघाला माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 14:47 IST

कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी देसाईगंजातून माेर्चा काढला.

ठळक मुद्देदाेन ठिकाणी अडविले : पायदळ निघाल्यानंतर पाेलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी २४ जानेवारी राेजी देसाईगंजातून माेर्चा काढला. तरीही या माेर्च्याला कुरूड व काेंढाळा येथे पाेलिसांनी अडविले. शेवटी माेर्चेकरू पायदळ आरमाेरीच्या दिशेने निघाले; परंतु पाेलिसांनी प्रमुख लाेकांना ताब्यात घेत माेर्चा माेडून काढला.

कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा मिळावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख (आरमाेरी विधानसभा क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनाने शेतकरी देसाईगंज येथे एकवटले. त्यानंतर माेर्चेकरू गडचिरोलीच्या महावितरण कार्यालयाकडे निघाले. असता कुरूड फाट्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावून मोर्चा अडविला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कुरूड फाट्यावर दोन तास चक्काजाम केला व पायदळ निघाले. याचवेळी महावितरण कंपनीचे देसाईगंज येथील कार्यकारी अभियंता डोंगरवार यांच्यासह कुरखेडाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे व देसाईगंजचे अभियंता सारवे आदींनी कोंढाळा ते आरमोरीच्यामध्ये माेर्चा थांबवून दोन तास चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. शेवटी पाेलीसबळाने माेर्चा माेडीत काढला. मोर्चात उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, सागर मने, भूषण सातव, शैलेश चितमलवार, नगरसेवक अशोक कंगाली, अनिल मिसार, अरुण राऊत, चिंटू नाकाडे, तानाजी ठाकरे तसेच कार्यकर्ते व शेतकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

काेंढाळ्यात तीन तास राेखला रस्ता

वेळाेवेळी पाेलिसांनी अडविल्यानंतर कोढाळा येथेसुद्धा शेतकऱ्यांनी तीन तास चक्काजाम आंदाेलन केले. यावेळी शेतकरी खूप आक्रमक झाल्याने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. आंदाेलनकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम, नंदू चावला,विकास प्रधान, विजय पुस्ताेडे यांच्यासह काही शेतकऱ्यांना पाेलिसांनी अटक केली.

पालकमंत्र्यांचे आश्वासन

२४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली. काही दिवसातच कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. दरम्यान शेतकऱ्यांचा मोर्चा गडचिरोली येथे पाेहोचू नये, याकरिता आरमोरी, पाेर्ला तसेच खरपुंडी फाट्यावर चाेख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीजagitationआंदोलन