शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पाच हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए, बँकांनी कर्ज नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:24 IST

Gadchiroli : कर्जासाठी सावकाराकडे धावाधाव, उत्पादन न झाल्याने वाढली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसरे कर्ज घ्यायचे असेल तर पहिल्या कर्जाची परतफेड करावी लागते. हा बँकांचा नियम आहे; मात्र मागील वर्षी कर्ज घेतलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. त्यामुळे त्यांना यावर्षीच्या हंगामात कर्ज मिळाले नाही. उलट या शेतकऱ्यांना व्याज भरून द्यावे लागणार आहे.

शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. काही जुजबी कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाते; मात्र दरवर्षी कर्ज मिळण्यासाठी त्याचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करून नवीन हंगामासाठी जूनमध्येच कर्ज उचलले आहे; मात्र १० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यांना यावर्षीचे कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे अडचण वाढली आहे. 

२५४ कोटींचे कर्ज वितरितमागील वर्षी सुमारे ३७ हजार २१७शेतकऱ्यांना २५४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. 

मुदत कधीपर्यंत ?जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्यांना ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा लागतो. त्यानंतर काही दिवसातच दुसऱ्या हंगामाचे कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना केवळ कर्जाची मुद्दल भरायची असते. 

कर्जमाफीचा भ्रमशासनाकडून पीक कर्ज माफ केले जाते, असा भ्रम काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे हे शेतकरी ऐपत असूनही जाणूनबुजून कर्ज भरत नाही. परिणामी त्यांना दुसऱ्या वर्षी कर्ज मिळत नाही. बँकेकडून कर्ज न मिळाल्याने पुन्हा सावकाराच्या दारात शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे. अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे.

शेती ही निसर्गावर अवलंबून आहे."प्रत्येक वर्षी उत्पादन होईलच याची शाश्वती राहत नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने ५० टक्के जरी कर्ज भरले तरी त्याला नवीन कर्ज उपलब्ध करावे. उर्वरित ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्यावा. त्याचे टप्पे पाडावे."- आसाराम कुंरजेकर, शेतकरी, खरकाळा

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरीbankबँक