शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए, बँकांनी कर्ज नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:24 IST

Gadchiroli : कर्जासाठी सावकाराकडे धावाधाव, उत्पादन न झाल्याने वाढली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसरे कर्ज घ्यायचे असेल तर पहिल्या कर्जाची परतफेड करावी लागते. हा बँकांचा नियम आहे; मात्र मागील वर्षी कर्ज घेतलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. त्यामुळे त्यांना यावर्षीच्या हंगामात कर्ज मिळाले नाही. उलट या शेतकऱ्यांना व्याज भरून द्यावे लागणार आहे.

शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. काही जुजबी कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाते; मात्र दरवर्षी कर्ज मिळण्यासाठी त्याचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करून नवीन हंगामासाठी जूनमध्येच कर्ज उचलले आहे; मात्र १० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यांना यावर्षीचे कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे अडचण वाढली आहे. 

२५४ कोटींचे कर्ज वितरितमागील वर्षी सुमारे ३७ हजार २१७शेतकऱ्यांना २५४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. 

मुदत कधीपर्यंत ?जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्यांना ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा लागतो. त्यानंतर काही दिवसातच दुसऱ्या हंगामाचे कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना केवळ कर्जाची मुद्दल भरायची असते. 

कर्जमाफीचा भ्रमशासनाकडून पीक कर्ज माफ केले जाते, असा भ्रम काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे हे शेतकरी ऐपत असूनही जाणूनबुजून कर्ज भरत नाही. परिणामी त्यांना दुसऱ्या वर्षी कर्ज मिळत नाही. बँकेकडून कर्ज न मिळाल्याने पुन्हा सावकाराच्या दारात शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे. अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे.

शेती ही निसर्गावर अवलंबून आहे."प्रत्येक वर्षी उत्पादन होईलच याची शाश्वती राहत नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने ५० टक्के जरी कर्ज भरले तरी त्याला नवीन कर्ज उपलब्ध करावे. उर्वरित ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्यावा. त्याचे टप्पे पाडावे."- आसाराम कुंरजेकर, शेतकरी, खरकाळा

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरीbankबँक