शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

देसाईगंजमध्ये पाच शाळकरी बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:15 IST

स्थानिक नगर परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाच शाळकरी बालकांना रस्त्यात गाठून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देव्यापार नगरीत खळबळ : वेळेवर वाहन पोहचू न शकल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला, पोलिसांपुढे शोध घेण्याचे आव्हान

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : स्थानिक नगर परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाच शाळकरी बालकांना रस्त्यात गाठून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावरील शेतातल्या खोलीत पाच तास कोंडून ठेवल्यानंतर त्यांना तेथून दुसरीकडे हलविण्यापूर्वीच या बालकांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेतली.सोमवारी (दि.५) घडलेल्या या घटनेची तक्रार रात्री मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी दिवसभर या घटनेचा तपास केला. मात्र सायंकाळपर्यंत कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. चेतन रोशन मेश्राम (वर्ग तिसरा), रामेश्वर मुराज जुमनाके (वर्ग दुसरा) तृणाली विशाल मेश्राम, समीर प्रकाश जुमनाके (वर्ग तिसरा) आणि गौरव नवनाथ पत्रे (वर्ग चौथा) अशी त्या बालकांची नावे आहेत. हे सर्व बालक तुकूम वार्डमधील रहिवासी आहेत. सोमवारी सकाळी १० वाजतादरम्यान ते आंबेडकर-पटेल वॉर्डमधील नगर पालिकेच्या मराठी प्राथमिक शाळेत जाण्यासाठी शॉर्टकट असलेल्या पायवाटेने निघाले होते. अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात चेहऱ्यावर मास्क लावलेल्या ६ जणांनी त्या मुलांना पकडले आणि अनिकेत महाविद्यालयाच्या मागील पटेल यांच्या शेतातील झोपडीत नेले. तिथे त्यांच्या तोंडावर पट्टी बांधून हातपायही बांधून ठेवण्यात आले. काय होत आहे हे न कळल्याने ही मुले चांगलीच घाबरून गेली होती. तब्बल पाच तास त्या मुलांना त्याच अवस्थेत ठेवण्यात आले.यादरम्यान अपहरणकर्त्यांपैकी एक व्यक्ती कोणाशीतरी फोनवरून वारंवार संपर्क करून गाडी तत्काळ पाठविण्यास सांगत होता. मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत वाहन पोहोचले नसल्यामुळे अपहरणकर्तेही घाबरले. अजून जास्त वेळ तिथे मुलांना ठेवणे जोखमीचे ठरेल असा विचार करून त्यांनी शेवटी त्या मुलांना सोडून दिले. मात्र त्याच वेळी अपहरणकर्त्यांना हवी असलेली गाडी तिथे पोहोचली. त्यामुळे अपहरणकर्त्यांपैकी काही जण पुन्हा त्या मुलांना पकडण्यासाठी धावले. पण मुलांना घराच्या दिशेने धूम ठोकल्याने त्यांच्या हाती लागले नाही. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी भादंवि कलम ३४१, ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार सिद्धांत मांडवकर यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक सूरज गोरे अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहे.राखणदार लग्नातअपहरणकर्त्यांनी या शाळकरी मुलांना ज्या शेतातील झोपडीत ठेवले होते त्या झोपडीत देसाईगंजच्या भगतसिंग वॉर्डमधील ७० वर्षीय रहिवासी नत्थुजी कोहपरे राहात होते. ते शेताची राखण करतात. परंतू घटनेच्या दिवशी ते आपल्या नातेवाईकांच्या गावाला लग्नासाठी गेले होते. त्याचा फायदा घेत अपहरणकर्त्यांनी पाचही मुलांना त्या झोपडीत पाच तास डांबून ठेवले.सहा वर्षानंतर पुनरावृत्तीव्यापारी शहर असलेल्या देसाईगंज शहरात यापूर्वीही अशी घटना घडली आहे. २०१२ मध्ये येथील रेल्वे स्थानकावरून चार बालकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. सहा वर्षानंतर पुन्हा त्याच पद्धतीची घटना घडल्यामुळे शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. हे बालक श्रीमंत घरचे नसताना त्यांचे अपहरण करण्यामागील उद्देश काय? हे कोडे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा