शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
2
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
3
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
4
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
5
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
6
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
7
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
8
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
9
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
10
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
11
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
12
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
13
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
14
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
15
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
16
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
17
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
18
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
19
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांचा मोर्चा

By admin | Updated: June 23, 2014 23:50 IST

वनहक्क कायद्याअंतर्गत ८८९ व पेसा कायद्याअंतर्गत १ हजार २७ असे एकूण १ हजार ९१६ मामा तलावांवरील मच्छीमारांचा हक्क काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार समाजावर

हक्कासाठी आंदोलन : पाच हजार नागरिकांची उपस्थितीगडचिरोली : वनहक्क कायद्याअंतर्गत ८८९ व पेसा कायद्याअंतर्गत १ हजार २७ असे एकूण १ हजार ९१६ मामा तलावांवरील मच्छीमारांचा हक्क काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार समाजावर उपासमारीचे संकट कोसळले असल्याने या तलावांचा ताबा मच्छीमार संस्थांकडे देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाभरातील सुमारे ५ हजार मच्छीमार नागरिकांनी शिवाजी महाविद्यालयातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मात्र जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पेसा कायद्याची गडचिरोली जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत आदिवासी गावाच्या सभोवतालच्या जल, जमीन व जंगलावर आदिवासींचे स्वामित्व मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेकडो गावांना सामूहिक वनहक्काअंतर्गत जमिनीबरोबरच तलावांचेही मालकी हक्क देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मच्छीमार समाजाची संख्या दीड लाखाच्या जवळपास आहे. प्रत्येक गावामध्ये या समाजाचे किमान १० ते १५ घरे दिसून येतात. मच्छीमार करणे हाच या नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र पेसा व वनहक्क कायद्याअंतर्गत तलावांचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत. त्यामुळे मच्छीमार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हातातून गेला आहे. जिल्ह्यातील वनहक्क कायद्यांतर्गत ८८९ व पेसा कायद्यांतर्गत १ हजार २७ गावांचे अधिकार ग्रामसभेकडे देण्यात आले आहेत. ग्रामसभा आपल्या मालकीतील तलाव मच्छीमार सहकारी संस्थांना उपलब्ध करून न देता ठेकेदारांना देत आहेत. त्यामुळे मच्छीमार संस्था अडचणीत आल्या आहेत. मागील वर्षीसुद्धा वनहक्क कायद्यानुसार या तलावांचे मालकी हक्क ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आले होते. अशा ग्रामपंचायतींनी लिलावाची कारवाई न केल्यामुळे अनेक तलाव मच्छीमार संस्थांना उपलब्ध होऊ शकले नाही. जिल्हाभरातील दीड लाख नागरिकांचा रोजगार हिरावला आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. तलावांमधील मच्छीमारीचे अधिकार सहकारी संस्थांना देण्यात यावे, यासाठी अनेक निवेदने, आंदोलने करण्यात आली. मात्र अजूनपर्यंत हा तोडगा निघाला नाही. तलावांमधील मच्छीमारीचे अधिकार मच्छीमार समाजाला देण्यात यावे, यासाठी सोमवारी शिवाजी महाविद्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सुमारे ५ हजार पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. पेसा कायदा व वनहक्क कायदा रद्द करून या तलावांमधील मच्छीमारीचे अधिकार मच्छीमार समाजाला देण्यात यावे, अशा घोषणा करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याचे माहित होताच मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त केला. मोर्चा निघणार आहे, हे माहित असतांनाही जिल्हाधिकारी अनुपस्थितीत असल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.मोर्चाचे नेतृत्व बाबुराव बावणे, प्रभाकर मांडरे, प्रकाश लोणारे, डॉ. मिलिंद, नारायण तोकलवार, प्रकाश नाने यांनी केले. आंदोलनाला आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिष्टमंडळाने निवेदन सादर करून तलाव मच्छीमारीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. (नगर प्रतिनिधी)