शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीत गोदामाला आग

By admin | Updated: May 6, 2017 01:15 IST

आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली.

५० लाखांचे नुकसान : कपडे, बांगड्या, चपला जळून खाक; पंचनामा करून मदतीची मागणी प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी/आलापल्ली : आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास १० दुकानदारांचे साहित्य जळून खाक झाले आहेत. यामध्ये जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आलापल्ली येथील आठवडी बाजार परिसरात पांडे लाईनमन यांच्या मालकीची चाळ आहे. सदर चाळ आलापल्ली येथील काही दुकानदारांनी दुकानातील सामान ठेवण्याासठी भाडे तत्वावर घेतली होती. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत तर्फे गोदामाच्या अगदी मागच्या बाजुला असलेल्या कचऱ्याच्या ढिगांना आग लावली होती. सदर आग गोदामापर्यंत पोहोचली व गोदामाला आग लागली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या गोदामामध्ये विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे शार्टसर्कीटने आग लागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आग लागल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस उपनिरिक्षक कोळेकर, वाहतूक पोलीस हवालदार संतोष मंथनवार, पोलीस हवालदार संतोष पवार यांनी बाजारवाडीतील युवकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासाने आग आटोक्यात आली. तोपर्यंत गोदामातील सामान जळून खाक झाले. आग लागल्यावर ग्रामपंचायतमधील एकही पदाधिकाऱ्याने घटनास्थळी हजेरी लावली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या ठिकाणी सामान ठेवणारे दुकानदार विविध बाजार फिरून दुकान थाटत होती. या दुकानदारांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आलापल्लीचे तलाठी एकनाथ चांदेकर यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. आलापल्ली उपविभागात अग्नीशमन दलाचे वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ज्या नागरिकांचे सामान जळाले आहे, ते नागरिक हातावर आणून पानावर खाणारे आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. या दुकानदारांचे झाले नुकसान स्वप्नील शिंदे यांचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गणेश सिकदर यांचे ४.५ लाख, जीवन सिकदर यांचे ३ लाख, नारू आईलवार यांचे ३ लाख, जयश्री कुमरे यांचे ३ लाख, पद्मावती मडावी यांचे १.५ लाख, अन्नपूर्णा समुद्रकोलावार यांचे दोन लाख, अशोक बंडावार व संतोष बंडावार यांचे चार लाख, पद्मा नाईलवार यांचे चार लाख, लक्ष्मीबाई मित्रावार यांचे चार लाख, पुष्पा सिकदर यांचे चार लाख, अशोक दुर्गे यांचे दोन लाख, उमा गुडलवार यांचे तीन लाख, श्रीनिवास रामगिरवार यांचे १.५ लाख, भास्कर राऊत यांचे एक लाख, किशन रामटेके यांचे १.५ लाख, छत्रपती खोब्रागडे यांचे एक लाख, फिरोज शेख १.५ लाख, मदनाबाई रामगिरी एक लाख, हयद खान यांचे दोन लाख, श्रीनिवास मनिषा यांचे ५० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कपडे, दागिणे, भांडे, चपल, बांगड्या आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.