शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीत गोदामाला आग

By admin | Updated: May 6, 2017 01:15 IST

आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली.

५० लाखांचे नुकसान : कपडे, बांगड्या, चपला जळून खाक; पंचनामा करून मदतीची मागणी प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी/आलापल्ली : आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास १० दुकानदारांचे साहित्य जळून खाक झाले आहेत. यामध्ये जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आलापल्ली येथील आठवडी बाजार परिसरात पांडे लाईनमन यांच्या मालकीची चाळ आहे. सदर चाळ आलापल्ली येथील काही दुकानदारांनी दुकानातील सामान ठेवण्याासठी भाडे तत्वावर घेतली होती. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत तर्फे गोदामाच्या अगदी मागच्या बाजुला असलेल्या कचऱ्याच्या ढिगांना आग लावली होती. सदर आग गोदामापर्यंत पोहोचली व गोदामाला आग लागली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या गोदामामध्ये विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे शार्टसर्कीटने आग लागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आग लागल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस उपनिरिक्षक कोळेकर, वाहतूक पोलीस हवालदार संतोष मंथनवार, पोलीस हवालदार संतोष पवार यांनी बाजारवाडीतील युवकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासाने आग आटोक्यात आली. तोपर्यंत गोदामातील सामान जळून खाक झाले. आग लागल्यावर ग्रामपंचायतमधील एकही पदाधिकाऱ्याने घटनास्थळी हजेरी लावली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या ठिकाणी सामान ठेवणारे दुकानदार विविध बाजार फिरून दुकान थाटत होती. या दुकानदारांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आलापल्लीचे तलाठी एकनाथ चांदेकर यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. आलापल्ली उपविभागात अग्नीशमन दलाचे वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ज्या नागरिकांचे सामान जळाले आहे, ते नागरिक हातावर आणून पानावर खाणारे आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. या दुकानदारांचे झाले नुकसान स्वप्नील शिंदे यांचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गणेश सिकदर यांचे ४.५ लाख, जीवन सिकदर यांचे ३ लाख, नारू आईलवार यांचे ३ लाख, जयश्री कुमरे यांचे ३ लाख, पद्मावती मडावी यांचे १.५ लाख, अन्नपूर्णा समुद्रकोलावार यांचे दोन लाख, अशोक बंडावार व संतोष बंडावार यांचे चार लाख, पद्मा नाईलवार यांचे चार लाख, लक्ष्मीबाई मित्रावार यांचे चार लाख, पुष्पा सिकदर यांचे चार लाख, अशोक दुर्गे यांचे दोन लाख, उमा गुडलवार यांचे तीन लाख, श्रीनिवास रामगिरवार यांचे १.५ लाख, भास्कर राऊत यांचे एक लाख, किशन रामटेके यांचे १.५ लाख, छत्रपती खोब्रागडे यांचे एक लाख, फिरोज शेख १.५ लाख, मदनाबाई रामगिरी एक लाख, हयद खान यांचे दोन लाख, श्रीनिवास मनिषा यांचे ५० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कपडे, दागिणे, भांडे, चपल, बांगड्या आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.