शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

आलापल्लीत गोदामाला आग

By admin | Updated: May 6, 2017 01:15 IST

आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली.

५० लाखांचे नुकसान : कपडे, बांगड्या, चपला जळून खाक; पंचनामा करून मदतीची मागणी प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी/आलापल्ली : आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास १० दुकानदारांचे साहित्य जळून खाक झाले आहेत. यामध्ये जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आलापल्ली येथील आठवडी बाजार परिसरात पांडे लाईनमन यांच्या मालकीची चाळ आहे. सदर चाळ आलापल्ली येथील काही दुकानदारांनी दुकानातील सामान ठेवण्याासठी भाडे तत्वावर घेतली होती. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत तर्फे गोदामाच्या अगदी मागच्या बाजुला असलेल्या कचऱ्याच्या ढिगांना आग लावली होती. सदर आग गोदामापर्यंत पोहोचली व गोदामाला आग लागली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या गोदामामध्ये विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे शार्टसर्कीटने आग लागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आग लागल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस उपनिरिक्षक कोळेकर, वाहतूक पोलीस हवालदार संतोष मंथनवार, पोलीस हवालदार संतोष पवार यांनी बाजारवाडीतील युवकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासाने आग आटोक्यात आली. तोपर्यंत गोदामातील सामान जळून खाक झाले. आग लागल्यावर ग्रामपंचायतमधील एकही पदाधिकाऱ्याने घटनास्थळी हजेरी लावली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या ठिकाणी सामान ठेवणारे दुकानदार विविध बाजार फिरून दुकान थाटत होती. या दुकानदारांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आलापल्लीचे तलाठी एकनाथ चांदेकर यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. आलापल्ली उपविभागात अग्नीशमन दलाचे वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ज्या नागरिकांचे सामान जळाले आहे, ते नागरिक हातावर आणून पानावर खाणारे आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. या दुकानदारांचे झाले नुकसान स्वप्नील शिंदे यांचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गणेश सिकदर यांचे ४.५ लाख, जीवन सिकदर यांचे ३ लाख, नारू आईलवार यांचे ३ लाख, जयश्री कुमरे यांचे ३ लाख, पद्मावती मडावी यांचे १.५ लाख, अन्नपूर्णा समुद्रकोलावार यांचे दोन लाख, अशोक बंडावार व संतोष बंडावार यांचे चार लाख, पद्मा नाईलवार यांचे चार लाख, लक्ष्मीबाई मित्रावार यांचे चार लाख, पुष्पा सिकदर यांचे चार लाख, अशोक दुर्गे यांचे दोन लाख, उमा गुडलवार यांचे तीन लाख, श्रीनिवास रामगिरवार यांचे १.५ लाख, भास्कर राऊत यांचे एक लाख, किशन रामटेके यांचे १.५ लाख, छत्रपती खोब्रागडे यांचे एक लाख, फिरोज शेख १.५ लाख, मदनाबाई रामगिरी एक लाख, हयद खान यांचे दोन लाख, श्रीनिवास मनिषा यांचे ५० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कपडे, दागिणे, भांडे, चपल, बांगड्या आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.