शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर इटियाडाेह धरणाचे पाणी शेतात पाेहाेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली; परंतु ऐनवेळी मागील पंधरा दिवसांपासून इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारे उभे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : इटियाडोह पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थांनी आरमोरी, अरसोडा व पालोरा येथील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकाला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पंधरा दिवस लोटूनही इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांचे धान पीक धोक्यात आले हाेते. शेतकऱ्यांनी आंदाेलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी साेडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली; परंतु ऐनवेळी मागील पंधरा दिवसांपासून इटियाडोह पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारे उभे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी  इटियाडोह पाटबंधारे विभागाला वारंवार पाणी सोडण्याची विनंती करून पाणी द्यावे किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे व इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात न आल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा  संतप्त शेतकऱ्यांनी दिलीप घोडाम, माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार  यांच्या नेतृत्वात दिला होता. याची दखल घेत इटियाडोह प्रकल्पात प्रशासनाने पाणी साेडले आहे. 

३०० हेक्टरला लाभ -    उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरमाेरी, पालोरा व अरसोडा येथील  शेतकऱ्यांनी जवळपास ३००  हेक्टरवर धान पिकाची लागवड केली आहे. मात्र, पाणी मिळत नसल्याने धान पीक करपण्यास सुरुवात झाली हाेती. शेतकऱ्यांनी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने पाणी साेडले आहे. यामुळे धान पिकाला संजीवनी मिळाली आहे.

 

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प