शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कोरची-कोटगूल मार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून २५ मार्चपासून रस्ता अडविला होता.

ठळक मुद्देयंत्रणा पोहोचली : छत्तीसगड राज्याने सीमांवर चेकपोस्ट बसवून केली होती नाकेबंदी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूल मार्गावर सीमांवर चेक पोस्ट बसवून नाकेबंदी केली. तसेच नागरिकांनी झाडे टाकून हा मार्ग बंद केला होता. मार्ग बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची अडचण वाढली होती. याबाबत लोकमने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले होते. अखेर छत्तीसगड व महाराष्टÑ या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सदर मार्गावरील झाडे जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्च ते १४ एप्रिल अशा एकूण २१ दिवसांपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून २५ मार्चपासून रस्ता अडविला होता. परिणामी कोटगूल भागातील नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत होते.या संदर्भात लोकमतने ३ एप्रिलला ‘छत्तीसगडच्या सीमा बंदीचा कोरची तालुक्यातील गावांना फटका’ या मथड्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत छत्तीसगडच्या प्रशासनाला कळविले. राजनांदगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जयप्रकाश मोर्य यांच्या आदेशानुसार ५ एप्रिल रोजी रविवारला उपविभागीय अधिकारी सी. जी. बघेल, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश कांबळे, मोहलाचे तहसीलदार ठाकूर, चिल्हाटीचे पोलीस निरीक्षक नासीर भट्टी, कोरचीचे तहसीलदार सी. आर. भंडारी, नायब तहसीलदार बी. आर. नारनवरे, पुरवठा निरीक्षक नरेश सिडाम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सद्दीन भामानी आदींनी प्रत्यक्ष रस्ता अडविलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कापलेली झाडे रस्त्यावर टाकून रस्ता अडविण्यात आल्याचे दिसून आले.छत्तीसगड व महाराष्टÑ या दोन्ही राज्याच्या अधिकाºयांनी मिळून गावातील नागरिकांच्या सहकार्यातून जेसीबीच्या सहाय्याने या मार्गावर टाकलेले झाडे हटविण्यात आले. कोरची-कोटगूल मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. बंजारी, वासडी येथील नागरिकांनी झाडे सरकविण्यास मदत केली. सदर झाडे सरविण्यास एक तास लागला.१० दिवसानंतर मार्ग सुरूकोरची-कोटगूल मार्ग बंद असल्याने सीमांवरील गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. झाडे टाकून मार्ग बंद केल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तब्बल दहा दिवस सदर मार्ग बंद होता. परिणामी याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. प्रशासन सर्तक होऊन मार्गावरील झाडे हटवून मार्ग सुरू करण्यात आला. दहा दिवसानंतर मार्ग सुरू झाल्याने नागरिकांनी लोकमतचे आभार मानले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी