शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
5
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
6
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
7
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
8
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
9
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
10
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
11
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
12
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
13
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
14
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
15
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
16
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
17
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
18
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
19
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
20
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
Daily Top 2Weekly Top 5

खतही महागले, शेती करायची कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:39 IST

अलिकडच्या काळात रासायनिक खताच्या शेतीवर टीका हाेत असली, तरी दर एकरी उत्पादन वाढविण्यास याच रासायनिक खतांनी मदत केली आहे. ...

अलिकडच्या काळात रासायनिक खताच्या शेतीवर टीका हाेत असली, तरी दर एकरी उत्पादन वाढविण्यास याच रासायनिक खतांनी मदत केली आहे. त्यामुळे आताही शेतकरी रासायनिक खतांचा वापर करताे. रासायनिक खत हा शेतीचा अविभाज्य घटक बनला आहे. शेतीच्या एकूण उत्पादन खर्चात रासायनिक खतांवर हाेणाऱ्या खर्चाचा वाटा जवळपास २० टक्के आहे. पुढील आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने खतांच्या किमतीमध्ये जवळपास २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रतीबॅग जवळपास २०० ते ३०० रुपये किमत वाढणार आहे. आधीच महागाई वाढत आहे, त्यातच आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.

बाॅक्स

विदेशातून हाेते आयात

सर्वच प्रकारचे रासायनिक खत विदेशातून आयात करावे लागतात. देशात फक्त त्याची पॅकिंग व मिक्सिंगचे काम हाेते. विदेशात खतांच्या किमती वाढल्या असल्याने देशातही किमती वाढविल्या जात आहेत.

रासायनिक खतांमुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी शेतमालाचा दर्जा घसरला आहे. तसेच उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. या दाेन्ही समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करण्याचे आवाहन व प्रशिक्षण कृषी विभागामार्फत दिले जात आहे. शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय खतांचा वापर करण्याची गरज आहे.

६५ हजार मेट्रीक टन खताचा वापर

जिल्हाभरातील शेतकरी वर्षभरात सुमारे ६५ हजार मेट्रीक टन रासायनिक खताचा वापर करीत असल्याची नाेंद कृषी विभागाकडे आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर हाेत असल्याने किंमत वाढीचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर व शेतकऱ्यांच्या नफ्यावर हाेणार आहे.

इतर जिल्ह्यांपेक्षा किमती अधिक

गडचिराेली जिल्ह्यात एकमेव देसाईगंज येथे रेल्वे रॅक पाॅईंट आहे. याच ठिकाणी खत उतरविले जाते. देसाईगंज हे जिल्ह्याच्या उत्तर टाेकावर आहे. दक्षिणेच्या टाेकावर असलेल्या सिराेंचा तालुक्यातील ३०० किमीपर्यंत खताची वाहतूक ट्रकच्या साहाय्याने करावी लागते. खत कंपन्या १३० किमीपर्यंत वाहतूक खर्च जाेडत नाहीत. १३० पेक्षा अधिक अंतर असल्यास वाहतूक खर्च दुकानदारांवर व अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांवर लादला जातो. जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता वाहतूक खर्च अधिक पडतो. तसेच यावर्षी डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चही वाढणार आहे.

प्रतिक्रिया

रासायनिक खतांमुळेच शेतीचा उत्पादन खर्च वाढून शेती अडचणीत आली आहे. रासायनिक खतांच्या किमती पुन्हा वाढल्या असल्याने शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पूर्वी उत्पादन कमी हाेते, तरीही शेती फायद्यात हाेती. आता उत्पादन वाढले तरी शेती ताेट्यात जात आहे. याचा विचार शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.

- शिवराम डाेमळे, शेतकरी

रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीचे माेठे नुकसान झाले आहे. मात्र नाइलाजास्तव खताचा वापर करावा लागत आहे. रासायनिक खतांमुळे शेतजमीन नापिक बनत चालली आहे. शेतकऱ्यांनी मर्यादित प्रमाणातच खतांचा वापर करावा.

- डंबाजी पेंदाम, शेतकरी

खताचा प्रकार आताची किंमत नंतरची किंमत

डीएपी १२५० १४५०

एमओपी ९७० १८७०

२०-२०-०-१३ १००० १२००

१५-१५-१५ १०६० १२६०गडचिराेली : नवीन आर्थिक वर्षापासून रासायनिक खतांच्या किमती जवळपास २५ टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे शेती करायची कशी, अशी प्रतिक्रिया जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.