शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीन मेडिगड्डाच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमोबदला देण्याची मागणी : पिकांसह जमीन खरडून जात असल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे आसरअल्ली, अंकिसा, गुमलकोंडा परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन खरडून जात आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान होत आहे.मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून जात आहे, अशा शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्याची मागणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम यांनी केली आहे.धरणापासून १० ते १५ किमी अंतरावरील शेतकºयांना याचा फटका बसत आहे. अंकिसा परिसरातील नडीकुडा, कोतापल्ली, चिंत्तारवेला, अंकिसा, लक्ष्मीदेवीपेठा, गेर्रापल्ली, बोराईगुडम, आसरअल्ली, सुनकरअल्ली, टेकडामोटला, गुमलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी समय्या तोरकर, सडवली गुडूरी, दामोधर सिपीडी, पापया पाले, धर्मया कोठारी, नारायण पाले, जयराम चौधरी या शेतकºयांनी केली आहे.संबंधित शेतकºयांना मोबदला न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. महाराष्टÑ शासनाच्या सहमतीने तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर धरण बांधले आहे. या धरणामुळे जे काही नुकसान होणार आहे, त्यासाठी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याची जबाबदारी महाराष्टÑ शासनाची आहे. शेतकºयांच्या मागणीला तेलंगणा सरकार भीक घालणार नाही. त्यामुळे महाराष्टÑ शासनाने मध्यस्ती करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Damधरणagricultureशेती