शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, 'ॲग्रिस्टॅक' नोंदणी केली तरच मिळणार योजनांचा लाभ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:17 IST

दुर्गम गावांत अडचणी : सेतू केंद्रांचा अभाव, ऑनलाइन नेटवर्कची समस्या, शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकरी खातेदारांसह त्यांनी धारण केलेली एकूण शेतजमीन किती यासह शेतीविषयक विविध माहिती अंतर्भूत करण्यासाठी भारत सरकारची ॲग्रिस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ४५ हजार २८८ शेतकरी खातेदारांनी नोंदणी केली आहे. शेतकरी नोंदणीमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. सेतू केंद्रातून किंवा अन्य ऑनलाइन सुविधा केंद्रातून संकेतस्थळाचा वापर करून शेतकरी नोंदणी करू शकतात. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांची माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव, नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यात आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात आली.

नोंदणी केली तरच मिळणार योजनांचा लाभअॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी केली तरच शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. शासन त्यानुसार पुढील नियमावली किंवा ध्येयधोरण आखू शकते. अतिदुर्गम भागात मात्र यासाठी अडचणी आहेत

८२ टक्केनोंदणी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जिल्ह्यात झाली आहे. सर्वाधिक नोंदणी मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

३० हजार शेतकरी बाकीजिल्ह्यात एकूण १ लाख ७५ हजार ३८४ शेतकरी खातेदारांपैकी १ लाख ४५ हजार २८८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी केलेली आहे. अजूनही ३० हजार २६ शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीfarmingशेतीFarmerशेतकरी