शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अधिकच्या वीज बिलाने शेतकरी चक्रावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते.

ठळक मुद्देकाेंढाळातील शेतकऱ्यांना महावितरणचा शाॅक : अनेकांना ३० हजार रुपयांपेक्षा जास्त बिल

  नितेश पाटील लाेकमत न्यूज नेटवर्ककुरूड : देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कृषिपम्पाचे वार्षिक वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचे पाठविले आहे. एवढे माेेठे वीज बिल बघून शेतकऱ्यांना धक्काच पाेहाेचला आहे. काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते. मात्र महावितरणने २०२० या वर्षात एकदाही शेतकऱ्यांना बिल पाठविले नाही. नाेव्हेंबर महिन्यात अनेक शेतकऱ्यांना वर्षभराचे वीज बिल मिळाले आहे. हे वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात आलेले वीज बिल बघून शेतकरी थक्क झाले आहेत.दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगेच्या पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यामुळे वीज मीटर बंद पडून वीज पुरवठा खंडीत झाला हाेता. तेव्हापासून शेतकऱ्यांनी माेटारपंपाचा वापर सुद्धा केला नाही. तरीही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे वार्षिक निव्वळ उत्पन्न ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत अधिकचे वीज बिल पाठविले असल्याने वीज बिल भरावे, कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काेंढाळा येथील शेतकरी सायत्राबाई वाढई यांना २९ हजार ३४० रुपये, दत्तू तुपट यांना ३३ हजार १२० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. अचानक एवढ्या माेठ्याप्रमाणात आलेले वीज बिल बघून वाढई आश्चर्यचकीत झाले आहेत.  

अंदाजाने पाठविले बिल

दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगा नदीला पूर आला या पुरात अनेक शेतकऱ्यांच्या वीज मीटरमध्ये पाणी शिरून वीज मीटर बंद पडले. हे मीटर अजूनही बंदच आहेत. असे असतानाही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. यावरून महावितरणने अंदाजे वीज बिल पाठविल्याचे स्पष्ट हाेत आहे. या अंदाजीत बिलांचा माेठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन वीज मीटरची पाहणी करूनच वीज बिल पाठविणे आवश्यक आहे. मात्र महावितरणचे कर्मचारी शेतात न जाताच वीज बिल पाठवित आहेत.

आपल्या तीन महिन्यांचे सरासरी दाेन हजार रुपये बिल पाठविले जात हाेते. विजेच्या वापराएवढेच हे बिल असल्याने भरण्यात काेणतीही अडचण जात नव्हती. मात्र महावितरणने अचानक ३३ हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. एवढे माेठे विज बिल भरणे शक्य नाही. महावितरणचे कर्मचारी शेतांवर न जाताच अंदाजे वीज बिल पाठवितात. याची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागते. - दत्तू तुपट, शेतकरी, काेंढाळा

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज