शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

आकस्मिक स्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्वच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देनुकसान होऊनही भरपाईपासून वंचित : मानापूर परिसरातील शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : दिवाळीच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे मानापूर, देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विम्यावरचा विश्वास उडायला लागला आहे.आकस्मिक स्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्वच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर मदत नुकसानभरपाई मिळेल, याच उद्देशाने शेतकऱ्यांनी पीक विमे काढले आहेत. नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन अधिकारी वर्गाकडून दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शासन व विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.जड धान पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असताना तसेच हलके धान कापून झाले असताना पावसाने हजेरी लावली. मानापूर, देलनवाडी परिसराला १५ दिवस पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे हलक्या धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या. तर जमिनीवर कोसळले. परिणामी दोन्ही प्रकारच्या धानाचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर ५० टक्क्याहून कमी उत्पादन झाले. पाण्यात भिजलेले धान व्यापारी खरेदी करण्यास तयार नाहीत. काही शेतकऱ्यांचा तर लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही. अशी बिकट परिस्थिती असतानाही मानापूर परिसरातील एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव मेश्राम, नामदेव किरंगे, बाजीराव पदा, दशरथ रणदिवे, बालाजी पेंदाम, राजेंद्र दशरथ, नामदेव सोनुले, शेषराव मेश्राम, अशोक किरंगे यांनी केली आहे.विमा मिळण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय?शेतकºयांनी पैसे भरून पिकाचा विमा काढला आहे. पिकाचे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. याबाबत काही शेतकºयांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, शासनाचे आदेश प्राप्त झाले नाही, असे उत्तर दिले आहे. विम्याचे पैसे शासनाने दिले नसून शेतकऱ्यांनी भरले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय, असा प्रश्न शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी