शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

आकस्मिक स्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्वच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देनुकसान होऊनही भरपाईपासून वंचित : मानापूर परिसरातील शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : दिवाळीच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे मानापूर, देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विम्यावरचा विश्वास उडायला लागला आहे.आकस्मिक स्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्वच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर मदत नुकसानभरपाई मिळेल, याच उद्देशाने शेतकऱ्यांनी पीक विमे काढले आहेत. नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन अधिकारी वर्गाकडून दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शासन व विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.जड धान पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असताना तसेच हलके धान कापून झाले असताना पावसाने हजेरी लावली. मानापूर, देलनवाडी परिसराला १५ दिवस पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे हलक्या धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या. तर जमिनीवर कोसळले. परिणामी दोन्ही प्रकारच्या धानाचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर ५० टक्क्याहून कमी उत्पादन झाले. पाण्यात भिजलेले धान व्यापारी खरेदी करण्यास तयार नाहीत. काही शेतकऱ्यांचा तर लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही. अशी बिकट परिस्थिती असतानाही मानापूर परिसरातील एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव मेश्राम, नामदेव किरंगे, बाजीराव पदा, दशरथ रणदिवे, बालाजी पेंदाम, राजेंद्र दशरथ, नामदेव सोनुले, शेषराव मेश्राम, अशोक किरंगे यांनी केली आहे.विमा मिळण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय?शेतकºयांनी पैसे भरून पिकाचा विमा काढला आहे. पिकाचे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. याबाबत काही शेतकºयांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, शासनाचे आदेश प्राप्त झाले नाही, असे उत्तर दिले आहे. विम्याचे पैसे शासनाने दिले नसून शेतकऱ्यांनी भरले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय, असा प्रश्न शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी