शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

मेडिगड्डाबाधित शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:38 IST

तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करत अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली व्यथा मांडली.

ठळक मुद्देप्रकल्पाचे पाणी शेतात : जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करत अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली व्यथा मांडली.यावेळी सिरोंचाचे नायब तहसीलदार एच.एस.सय्यद यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकºयांच्या समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले. भूमीहीन अतिक्रमणधारक शेतकºयांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, तसेच मेडिगड्डा सिंचन प्रकल्पबाधित सर्व गावांना प्रकल्पग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी आसरअल्ली परिसरातील भूमीहीन अतिक्रमणधारक व प्रकल्पबाधित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे असरअल्ली, अंकिसा, मुकिडगुट्टा, गुमालकोंडा, मोटलाटेकडा, सुंकारअली, मुत्तापूर आदी परिसरातील शेतकºयांचे धानपीक खरडून जात आहे. सुपीक शेतजमीन पाण्याखाली राहात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पाचे दरवाजे उघडे असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक राहत असून नदीची दरड कोसळून नदीकाठाची जमीन नदीपात्रात विलीन होत आहे. परिणामी अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरणापासून १० ते १५ किमी अंतरावरील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. जमीन खरडून जात आहे, अशा शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, नदीकुंटा, कोतापल्ली, चिंतारवेला, असरल्ली, लक्ष्मीदेवीपेठा, गेरापल्ली, गोराईगुडम, मोटलाटेकडा, गुमालकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी