शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

मेडिगड्डाबाधित शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:38 IST

तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करत अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली व्यथा मांडली.

ठळक मुद्देप्रकल्पाचे पाणी शेतात : जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करत अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली व्यथा मांडली.यावेळी सिरोंचाचे नायब तहसीलदार एच.एस.सय्यद यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकºयांच्या समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले. भूमीहीन अतिक्रमणधारक शेतकºयांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, तसेच मेडिगड्डा सिंचन प्रकल्पबाधित सर्व गावांना प्रकल्पग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी आसरअल्ली परिसरातील भूमीहीन अतिक्रमणधारक व प्रकल्पबाधित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे असरअल्ली, अंकिसा, मुकिडगुट्टा, गुमालकोंडा, मोटलाटेकडा, सुंकारअली, मुत्तापूर आदी परिसरातील शेतकºयांचे धानपीक खरडून जात आहे. सुपीक शेतजमीन पाण्याखाली राहात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पाचे दरवाजे उघडे असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक राहत असून नदीची दरड कोसळून नदीकाठाची जमीन नदीपात्रात विलीन होत आहे. परिणामी अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरणापासून १० ते १५ किमी अंतरावरील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. जमीन खरडून जात आहे, अशा शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, नदीकुंटा, कोतापल्ली, चिंतारवेला, असरल्ली, लक्ष्मीदेवीपेठा, गेरापल्ली, गोराईगुडम, मोटलाटेकडा, गुमालकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी