शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:33 IST

अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे किसानसभा व शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदारांना निवेदनशासनाच्या धोरणाविरोधात रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, अ‍ॅड. जगदिश मेश्राम, संजय वाकडे, प्रशांत खोब्रागडे आदींनी केले. यावेळी सिंधू कापकर, मिनाक्षी सेलुकर, चंद्रभान मेश्राम, केवळराम नागोसे, सुरेश फुकटे, मारोतराव नरुले, अमोल दामले, मारोती सेलोटे, मनोज दामले, भुपाल घुटके, रमेश मेश्राम, अमलदास प्रधान, केशव ठाकरे, प्रकाश खोब्रागडे, सुरेश सोनटक्के, राजेश वानखेडे, धनपाल लांडगे, गणेश वझाडे, पुरूषोत्तम बांडे, ललित गेडाम आदी उपस्थित होते. तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

या आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व शेतमजूर विरोधी धोरणाचा निषेध केला. केंद्र व राज्य सरकारने कामगाराच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. रोजगार हमी योजनेसाठी शासनाकडून निधीची तरतूद केली जाते. मात्र मजुरांना कायद्यानुसार १०० दिवसांचा रोजगारही दिला जात नाही. परिणामी मजुरांचे हाल होतात. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.निवेदनातील प्रमुख मागण्याकोरोना लॉकडाऊनच्या काळात शेती व शेतकरीविरोधात काढलेले आदेश तत्काळ मागे घेण्यात यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा ७ हजार ५०० रुपये व १० किलो धान्य देण्यात यावे, मनरेगाच्या कायद्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रती वर्ष किमान २०० दिवसाचे काम देण्यात यावे व प्रती दिवस ६०० रुपये मजुरी देण्यात यावे. पेरणीपासून ते मळणीपर्यंतची शेतीची सर्व कामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी. डिझेल व पेट्रोलचे वाढलेले दर कमी करावे. रोग, पूर व अकाली पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे. घरगुती विजेचे दर कमी करावे. त्यावर आकारलेला टॅक्स व वहन आकार रद्द करावा. दावे सादर करणाºया शेतकºयांना वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :agitationआंदोलन