शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:33 IST

अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे किसानसभा व शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदारांना निवेदनशासनाच्या धोरणाविरोधात रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, अ‍ॅड. जगदिश मेश्राम, संजय वाकडे, प्रशांत खोब्रागडे आदींनी केले. यावेळी सिंधू कापकर, मिनाक्षी सेलुकर, चंद्रभान मेश्राम, केवळराम नागोसे, सुरेश फुकटे, मारोतराव नरुले, अमोल दामले, मारोती सेलोटे, मनोज दामले, भुपाल घुटके, रमेश मेश्राम, अमलदास प्रधान, केशव ठाकरे, प्रकाश खोब्रागडे, सुरेश सोनटक्के, राजेश वानखेडे, धनपाल लांडगे, गणेश वझाडे, पुरूषोत्तम बांडे, ललित गेडाम आदी उपस्थित होते. तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

या आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व शेतमजूर विरोधी धोरणाचा निषेध केला. केंद्र व राज्य सरकारने कामगाराच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. रोजगार हमी योजनेसाठी शासनाकडून निधीची तरतूद केली जाते. मात्र मजुरांना कायद्यानुसार १०० दिवसांचा रोजगारही दिला जात नाही. परिणामी मजुरांचे हाल होतात. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.निवेदनातील प्रमुख मागण्याकोरोना लॉकडाऊनच्या काळात शेती व शेतकरीविरोधात काढलेले आदेश तत्काळ मागे घेण्यात यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा ७ हजार ५०० रुपये व १० किलो धान्य देण्यात यावे, मनरेगाच्या कायद्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रती वर्ष किमान २०० दिवसाचे काम देण्यात यावे व प्रती दिवस ६०० रुपये मजुरी देण्यात यावे. पेरणीपासून ते मळणीपर्यंतची शेतीची सर्व कामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी. डिझेल व पेट्रोलचे वाढलेले दर कमी करावे. रोग, पूर व अकाली पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे. घरगुती विजेचे दर कमी करावे. त्यावर आकारलेला टॅक्स व वहन आकार रद्द करावा. दावे सादर करणाºया शेतकºयांना वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :agitationआंदोलन