शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

शेतकऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:22 IST

सद्य:स्थितीत धानपिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोगावच्या उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सद्य:स्थितीत धानपिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोंबर शनिवारपासून सिंचन योजनेतून शेतीला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.गोगावनजिकच्या वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गोगाव येथील ३५० ते ४०० एकर शेत जमिनीस सिंचनाची सुविधा निर्माण होऊ शकते. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी शेतीत धानपिकाची लागवड केली आहे. धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने जमिनीस भेगा पडून धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गोगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी ६ आॅगस्ट व १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन सादर केले होते. मात्र शेतजमिनीला पाणी सोडण्यात आले नाही.हाती येणारे पीक डोळ्यादेखत करपत असल्याचे बघून संतप्त झालेल्या अनेक शेतकºयांनी शुक्रवारी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गोगांव उपसा सिंचन योजनेतून तत्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोंबरपासून पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.यावेळी सीताराम टेंभूर्णे, लोमेश लाडे, भास्कर मुनघाटे, केवळराम नंदेश्वर, रमेश वनकर, तुळशीराम मानकर, भगवान गेडाम, दिवाकर राउत, हिरामण उंदीरवाडे, पेवानंद चुधरी, तुळशीराम मेश्राम, कृष्णानंद भरडकर, चंद्रशेखर भरडकर, बापूजी दिवटे, मारोती दिकोंडावार, महेश ठोंबरे, शामराव चिचघरे, सुनील बांगरे, दिवाकर बांगरे, धरमदास म्हशाखेत्री, मीना बाबनवाडे, विजय म्हशाखेत्री, नानाजी चौधरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी