शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सोयाबीनऐवजी कापसाकडे वळला जिल्ह्यातील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्यास सुरूवात केली. दरवर्षी सोयाबिन खालील क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देबाजारपेठेतील अंदाजानुसार बदल : मागील वर्षी सोयाबीनची केवळ ८७ हेक्टरवर लागवड; यावर्षीही क्षेत्र घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बदलत चाललेल्या बाजारपेठेचा अभ्यास करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकाला तिलांजली देत कापूस पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. दरवर्षी सोयाबिनचे क्षेत्र घटत चालले आहे. त्याच जमिनीत कापूस पिकाची लागवड केली जात असल्याने या पिकाचे क्षेत्र वाढत आहे.१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्यास सुरूवात केली. दरवर्षी सोयाबिन खालील क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच वर्षात सरासरी ३ हजार ९१० हेक्टरवर सोयाबिनची लागवड होत होती. २०१९-२० मध्ये केवळ ८७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड झाली आहे. यावर्षी तेवढीही लागवड होणार की नाही, याबाबत शंका आहे. कृषी विभागाने मात्र १ हजार ५०० हेक्अर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड होईल या दृष्टीने नियोजन केले आहे. सोयाबिनची जागा आता कापूस पीक घेत आहे. पाच वर्षांपूर्वी कापसाचा पेरा अत्यंत कमी होता. मात्र शेतकरी आता सोयाबिनच्या जागेवर कापूस पिकाची लागवड करीत आहे. कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ७३५ हेक्टर आहे. २०१९-२० मध्ये सुमारे १४ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. २०२० च्या खरीप हंगामात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होईल. यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे.पाच तालुक्यांमध्ये विशेष भरगडचिरोली तालुक्यात ५०० हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ४ हजार ७०० हेक्टर, सिरोंचा तालुक्यात ७ हजार हेक्टर, अहेरी तालुक्यात १ हजार ८०० हेक्टर व मुलचरो तालुक्यात १ हजार हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खते, कीटकनाशके, बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले आहे. इतरही तालुक्यांमधील शेती कापूस लागवडी योग्य आहे. त्यामुळे तेथील शेतकºयांना कापूस लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, कापसाला सिंचनाची आवश्यकता नाही. सिंचनाची सुविधा नसल्याच्या कारणामुळे शेतकरी जमीन पडीक ठेवतात. याच जमिनीत कापसाचे उत्पादन घेणे शक्य होते. ही बाब शेतकºयांना पटवून देण्याची गरज आहे. असे झाल्यास उर्वरितही तालुक्यांमध्ये कापसाचा पेरा वाढेल. विशेष म्हणजे, पडीक जमिनीत पीक घेतल्याने शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.आधारभूत कापूस खरेदी केंद्राची गरजशासनामार्फत राज्यभरात आधारभूत कापूस खरेदी केंद्र चालविले जातात. आधारभूत केंद्रावर व्यापाºयांच्या तुलनेत अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होते. गडचिरोली जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढला आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकही आधारभूत कापूस खरेदी केंद्र नसल्याने तेलंगणातील शेतकºयांकडून लूट होत असल्याची शेतकºयांची तक्रार आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती