शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

सोयाबीनऐवजी कापसाकडे वळला जिल्ह्यातील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्यास सुरूवात केली. दरवर्षी सोयाबिन खालील क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देबाजारपेठेतील अंदाजानुसार बदल : मागील वर्षी सोयाबीनची केवळ ८७ हेक्टरवर लागवड; यावर्षीही क्षेत्र घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बदलत चाललेल्या बाजारपेठेचा अभ्यास करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकाला तिलांजली देत कापूस पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. दरवर्षी सोयाबिनचे क्षेत्र घटत चालले आहे. त्याच जमिनीत कापूस पिकाची लागवड केली जात असल्याने या पिकाचे क्षेत्र वाढत आहे.१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्यास सुरूवात केली. दरवर्षी सोयाबिन खालील क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच वर्षात सरासरी ३ हजार ९१० हेक्टरवर सोयाबिनची लागवड होत होती. २०१९-२० मध्ये केवळ ८७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड झाली आहे. यावर्षी तेवढीही लागवड होणार की नाही, याबाबत शंका आहे. कृषी विभागाने मात्र १ हजार ५०० हेक्अर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड होईल या दृष्टीने नियोजन केले आहे. सोयाबिनची जागा आता कापूस पीक घेत आहे. पाच वर्षांपूर्वी कापसाचा पेरा अत्यंत कमी होता. मात्र शेतकरी आता सोयाबिनच्या जागेवर कापूस पिकाची लागवड करीत आहे. कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ७३५ हेक्टर आहे. २०१९-२० मध्ये सुमारे १४ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. २०२० च्या खरीप हंगामात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होईल. यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे.पाच तालुक्यांमध्ये विशेष भरगडचिरोली तालुक्यात ५०० हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ४ हजार ७०० हेक्टर, सिरोंचा तालुक्यात ७ हजार हेक्टर, अहेरी तालुक्यात १ हजार ८०० हेक्टर व मुलचरो तालुक्यात १ हजार हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खते, कीटकनाशके, बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले आहे. इतरही तालुक्यांमधील शेती कापूस लागवडी योग्य आहे. त्यामुळे तेथील शेतकºयांना कापूस लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, कापसाला सिंचनाची आवश्यकता नाही. सिंचनाची सुविधा नसल्याच्या कारणामुळे शेतकरी जमीन पडीक ठेवतात. याच जमिनीत कापसाचे उत्पादन घेणे शक्य होते. ही बाब शेतकºयांना पटवून देण्याची गरज आहे. असे झाल्यास उर्वरितही तालुक्यांमध्ये कापसाचा पेरा वाढेल. विशेष म्हणजे, पडीक जमिनीत पीक घेतल्याने शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.आधारभूत कापूस खरेदी केंद्राची गरजशासनामार्फत राज्यभरात आधारभूत कापूस खरेदी केंद्र चालविले जातात. आधारभूत केंद्रावर व्यापाºयांच्या तुलनेत अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होते. गडचिरोली जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढला आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकही आधारभूत कापूस खरेदी केंद्र नसल्याने तेलंगणातील शेतकºयांकडून लूट होत असल्याची शेतकºयांची तक्रार आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती